कायदा व सुव्यवस्थेसाठी आयुक्तालय हद्दीत शस्त्र आणि जमाव बंदी

shivrajya patra

सोलापूर : सोलापूर शहर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रमाणावर धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरे होणारे शहर आहे. सोलापूर शहरात छोट्या-मोठ्या कारणावरुन संप, आंदोलने, निदर्शने इत्यादि होत असतात. तसेच शहरात आगामी काळात तुलसी विवाह, गुरुनानक जयंती, इत्यादी सण, उत्सव साजरे होणार आहेत. तसेच वक्फ अध्यादेश, मराठा, ओबीसी व धनगर आरक्षण वगैरेच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेस बाधा होण्याची दाट शक्यता लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) आणि 37 (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

पोलीस आयुक्तालय हद्दीत लागू असलेला हा आदेश 27 ऑक्टोबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते 10 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री 24.00 वाजेपर्यंत प्रभावी राहील, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) गौहर हसन यांनी दिलीय.

या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे:

- मिरवणुका, सभा, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव 

- शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू 

- ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ 

- दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन 

- सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा 

- जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य 

हा आदेश खंड अ ते फ हे ज्या सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी उपनिर्दीष्ट वस्तु हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून हा आदेश लागू पडणार नाहीत.

कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश जारी करण्यात आला असून लग्न, अंत्ययात्रा यासारख्या वैयक्तिक कार्यक्रमांना हा आदेश लागू होणार नाही. तसेच सक्षम पोलीस प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्यास मिरवणुका, सभा, आंदोलने, निवेदने, धरणे यांना सूट मिळेल.

शहरातील नागरिकांनी शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे.

To Top