# ५७ ट्रॅक्टर ८ डंपर, ७ छोटा हत्ती,३९ घंटागाड्या च्या माध्यमातून उचलला कचरा
# सदस्यासाठी ४ टँकर थंड पाण्याचे नियोजन
# १५९८०००० स्क्वेअर मीटर म्हणजे ४६.०४ किलोमीटर एरिया स्वच्छ
# ६७४५०किलो ओला कचरा तर १३१४५० किलो सुका कचरा, असा एकूण १८८९०० किलो टोटल कचरा काढला शहराबाहेर
# सीनियर डिव्हिजन न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी ही हातून घेतला झाडू
सोलापूर/प्रतिनिधी : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा तालुका अलिबाग (जिल्हा रायगड) यांच्यावतीने पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सकाळी सोलापूर शहरामध्ये ४, ४८६ श्री सदस्यांच्या माध्यमातून भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आली. या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून एकूण ६७, ४५० किलो ओला कचरा, तर १, ३१, ४५० किलो इतका सुका कचरा मिळून १, ८८, ९०० किलो असा कचरा शहराबाहेर काढून शहरातील ४६.०४ किलोमीटर अंतराचे रस्ते अवघ्या अडीच तासांमध्ये चकाचक करण्यात आले.



...चौकट...
महापालिकेने नकाशे आणि मायक्रो प्लॅनिंग केले
शहरात ज्या-ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचे मार्ग व त्यासाठी केलेली व्यवस्था नकाशे श्री सदस्यांना महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले होते. बाहेरगावाहून आलेल्या सदस्यांना त्याचा चांगला उपयोग झाला.
...चौकट...
सतत राबविण्यात येते स्वच्छता अभियान
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान हे सेवाभावी कार्यासाठी प्रसिद्ध आहे. मानवाच्या अंतरंगातील असलेली अंधश्रद्धा व अज्ञान याचे निर्मूलनाचे कार्य या बैठकीच्या माध्यमातून केले जाते. त्याचबरोबर आपला परिसर स्वच्छ असावा, याकरिता श्री सदस्यांच्या माध्यमातून सातत्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येते.
14 मार्गावर निघाला १,८८,९०० किलो कचरा
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये शहरातील १४ मार्गावर ०१ लाख ८८ हजार ९०० किलो कचरा निघाला असून शहरातील इतर भागांमध्ये किती किलो कचरा असेल ? याचा अंदाजच न केलेला बरा, अशी प्रतिक्रिया शहरवासियांनी दिली.
...चौकट...
महापालिकेचा स्वच्छता विभाग काय करतो ?
शहराच्या स्वच्छतेकरीता महापालिकेच्या वतीने हजारो सफाई कामगार आहेत. जर शहरांमध्ये फक्त अडीच तासांमध्ये सरासरी २० टन एवढा कचरा निघत असेल तर मग शहराचा स्वच्छता विभाग काय काम करतो? असा प्रश्नही शहरवासियांमधून केला जात आहे.