... जे करायचं ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा
अंतरवाली सराटी : एकाच जातीवर निवडणूक लढवणे शक्य नाही. रात्री तीन तास चर्चा झाली. एका जातीवर जिंकणं आपण जिंकू शकत नाही. एकट्याने कसं लढायचं असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटले की, याला आण आणि त्याला पाड म्हणायची इच्छा नाही. लोकांना जे करायचं ते करा, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडणून आणा, असे सूचक वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले.
विधानसभा निवडणुकीचे अर्ज मागे घ्यायचा सोमवारी शेवटचा दिवस आहे, त्याआधी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील उमेदवारांच्या यादीची घोषणा न करता सगळ्यांना धक्का दिला.
जरांगे पाटील यांनी म्हटले, मध्यरात्री उशिरापर्यंत यादी आली नव्हती. आमचे 14 उमेदवार आणि इतर समाजाकडून उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. मध्यरात्री 3 वाजेपर्यंत चर्चा झाली नाही. त्यांची यादी न आल्याने एकाच जातीवर निवडणूक जिंकणे सोपं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी मागासवर्गीय आणि मुस्लिम समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. या समाजासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी जरांगे यांनी आपल्या काही जागा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आज उमेदवारांची नावे जाहीर होणार होती. मात्र, मित्रपक्षांनी उमेदवारांची नावे न पाठवल्याने आपण एकाच समाजाच्या मतांवर आणि एकाच समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून निवडून जाणे योग्य ठरणार नाही, असे जरांगे-पाटील यांनी म्हटले.
मनोज जरांगे-पाटील यांनी असं म्हटले
जरांगे यांनी या मतदारसंघाची केली होती घोषणा