देशभरातून अनेक मान्यवरांची उपस्थिती
श्रीरामपूर : श्रीरामपूरच्या हजरत सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रोत्सवाची या वर्षाची सुरुवात करणारा शुभारंभाचा कार्यक्रम बहारदार असा अखिल भारतीय कौमी एकता मुशायरा (कवि संमेलन) उद्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी, रविवारी, १४ एप्रिल रोजी रात्री ०८ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण यांनी दिली.
२३ वर्षांपूर्वी शहराच्या यात्रोत्सवाला जोडून मुशायरा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून कोरोना काळ वगळता उद्या होणारा हा अठरावा कार्यक्रम आहे. मुशायऱ्याचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. असे ही त्यांनी सांगितले.
उद्या होणाऱ्या अखिल भारतीय मुशायरा व कवी संमेलनामध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उर्दू शायर अबरार काशीफ तसेच मराठीचे जांगडगुत्ता फेम सुप्रसिद्ध कवी मिर्झा एक्सप्रेस यांचे सह आंतरराष्ट्रीय हास्य कवी राहत हरारत (तामिळनाडू), सुप्रसिद्ध उर्दू शायर कमर एजाज (औरंगाबाद), झहीर अख्तर (बहाणपूर), इर्शाद अंजूम (अनाऊन्सर), हिंदी कवी कपिल जैन (यवतमाळ), हास्य कवी इब्राहीम सागर (धुलिया), रोबोट मालेगावी तसेच इर्शाद वसीम (नासिक) व शाकिर अहमद शाकिर (जामखेड) हे नामवंत कवी व शायर उपस्थित राहणार असल्याची माहिती मुशायरा कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद रफीक शेख यांनी दिली.
गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम सय्यद बाबा दर्गा समोरील मैदानावर घेतला जात होता. परंतु तेथे रेल्वे खात्याचे बांधकाम झाल्याने जागा नसल्याने यावर्षी हा कार्यक्रम रेल्वे स्टेशन समोरील बॅरिस्टर रामराव आदिक पुतळा समोर असलेल्या मैदानात घेण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष व सय्यद बाबा उरूस कमिटीचे अध्यक्ष मुन्ना पठाण यांनी दिली.
सय्यद बाबा उरूस व रामनवमी यात्रेनिमित्त होणारा हा मुशायरा कार्यक्रम खूपच लोकप्रिय असून या कार्यक्रमासाठी आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक शायर व कवी यांनी श्रीरामपुरात उपस्थिती लावली आहे. अबरार काशिफ यांच्या रूपाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध उर्दू शायर यांना ऐकण्याची संधी श्रीरामपूरकरांना प्राप्त झाली असून काव्य रसिक व मुशायरा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुशायरा कमिटीचे कार्याध्यक्ष संजय जोशी यांनी केले आहे.
श्रीरामपूर शहराचा जातीय सलोखा व शहरवासीयांचे एकमेकांशी असलेले स्नेहबंध दृढ करण्यासाठी कौमी एकता मुशायरा हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका पार पाडीत असतो. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्वपक्षीय व सर्व धर्मीय नेते, कार्यकर्ते, नागरिक यांचा सहभाग हा उल्लेखनीय आहे.
श्रीरामपूरची शान वाढविणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी एक पर्वणी आहे. कार्यक्रम मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुशायरा कमेटीचे संघटक मुनीर शेख यांनी केले आहे.
रविवारी, १४ एप्रिल रोजी होणाऱ्या या मुशायरा व कवी संमेलनास सर्व काव्य व शायरी प्रेमी रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुशायरा कमेटीचे संस्थापक व संयोजक सलीमखान पठाण, अध्यक्ष मोहम्मद रफिक शेख, स्वागताध्यक्ष मुन्नाभाई पठाण, कार्याध्यक्ष संजय जोशी, संघटक मुनीरभाई शेख, उपाध्यक्ष - डॉ. रविंद्र कुटे, रियाज पठाण, जावेद काझी, शांतीलाल पोरवाल, मुख्तार मनियार, गणेश मगर, एजाज शेख, मोहम्मद रफिक (बाबा), सचिव आसिफ शेख, सहसचिव सलीम जहागिरदार, खजिनदार साजीद मिर्झा, सह खजिनदार फिरोज पोपटीया,दर्गाह विश्वस्त दिलावर पेंटर, सदस्य - सौ.रंजनाताई पाटील, रविंद्र गुलाटी, राजेश अलघ, श्रीनिवास बिहाणी, हरीश ओबेराय, अनिल पांडे, ॲड. बाबा शेख, गफ्फार पोपटीया, इरफान जिवाणी, ॲड. बाबा औताडे, रज्जाकभाई फिटर, ॲड. कलिम शेख, महाराज कंत्रोड, गुलशन कंत्रोड, नरेंद्र पाटणी, सुनिल गुप्ता, मंजीत चुग, अशोक गाडेकर, लालमहंमद जहागिरदार, रवि भागवत, मनोज आगे, महेश माळवे, अशोक उपाध्ये, संजय छत्ल्लारे, भगवान उपाध्ये, सुनिलराव बोलके, अशोक सातुरे, शाहिद कुरेशी, साजिद खान, पुरुषोत्तम झंवर, राजेंद्र सोनवणे, प्रताप देवरे, डॉ. निशिकांत चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर राहिंज, डॉ. सुनील उंडे, संजय माखीजा, रज्जाक पठाण, सय्यद फारुक सर, जाकीर सय्यद (सर), अल्ताफ शेख, नजिरभाई शेख, सत्यनाथ शेळके, राजु दारुवाला, अरुण मंडलिक, मो. बदर शेख, फिरोज शेख, साबिर शेख, बाळासाहेब सरोदे, प्रदिप दळवी, जितू विळस्कर, अभिजीत मुथा, सागर वर्मा, सादिक शिलेदार, फिरोज हमिद खान, जावेद हमीद शेख, लकी सेठी, इज्जू इनामदार, शकील खान, अमरप्रीत सेठी, अण्णा इंगळे, युसुफ शहा, असलम बिनसाद, जयेश सावंत, मयूर पांडे, भाऊसाहेब भोसले, शरीफ मेमन, युसूफ लाखाणी आदींनी केले आहे.