पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व दे नगरातील रहिवासी सौ. स्नेहा संतोष चिल्लाळ (वय-३० वर्षे), तिची मुलगी संध्या (वय- अंदाजे ११ वर्षे) आणि मुलगा (वय-०७ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत, मात्र सौ. स्नेहा चिल्लाळ हिच्या आत्महत्येने काही प्रश्न अनुत्तरीत ठेवलेत.
त्या घरामध्ये साडीच्या साह्याने तिघांनी गळफास घेतल्याचे संतोष चिल्लाळ यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी टाहो फोडून आक्रोश सुरू केला. त्यामुळे ही दु:खद घटना वाऱ्यासारखी सरवदे नगर परिसरात पसरली. काही क्षणातच तेथे बघ्यांची गर्दी वाढली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ पाहणी केला.
पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने हे तिघांना खाली उतरवले. त्याना बेशुध्दावस्थेत सिव्हिल हॉस्पिटलकडे उपचारासाठी रवाना केले, मात्र उपचारापूर्वी त्या तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर तिन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणीसाठी त्यांना शवविच्छेदन विभागाकडं पाठवून देण्यात आले.
सौ. स्नेहा हिने टोकाचं पाऊल उचलत दोन्ही मुलांना गळफास दिला असावा, त्यानंतर तिने आत्महत्या केली असावी असाही प्रत्यक्षदर्शींचा कयास आहे. एमआयडीसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.