Type Here to Get Search Results !

सोलापुरात घडलं माणुसकीचे दर्शन... ! भर रस्त्यात सोडलेल्या मुलांना मिळाला आसरा; मकरंद शिवशेट्टी यांनी घेतला पुढाकार


              वृत्तांकन : मुजम्मिल शहानूरकर.

सोलापूर : ज्यांना मुलं नाहीत, ते पालक अनाथ आश्रममधून मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करून सामाजिक कार्यात योगदान देत असतात. मात्र सोलापुरात एक दुर्दैवी घटना घडलीय, हडपसर येथून आलेल्या एक महिला तिच्या चिमुकल्या ३ मुलांना सोलापूर-पुणे हायवे रोडवर भर रस्त्यात सोडून निघून गेली. तळपत्या उन्हात अनवाणी पायांनी ही मुलं भरस्त्यात हिंडत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मकरंद शिवशेट्टी यांच्या निदर्शनास पडली. शिवशेट्टी यांनी त्या मुलांची चौकशी केली असता, आमची आई, आम्हाला भर रस्त्यात सोडून गेल्याचे त्या लहान मुलांनी सांगितले. 

तेव्हा मकरंद शिव शेट्टी यांनी फौजदार चावडी पोलिसांशी संपर्क साधून घडलेली हकीकत कळवली. दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवले. त्या लहान मुलांना मकरंद शिव शेट्टी यांनी त्या बालकांना सुपूर्द करून बालसुधाग्रहात पाठवण्यात आले. त्यामुळे त्या मुलांना मायेचा आधार मिळाला व आसराही मिळाला. नवरा-बायकोच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावरून अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने सोलापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.



तरी अशा पालकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आवाहन करण्यात येते की, जे आपल्या मुलांचा सांभाळ करण्यास असमर्थ असतील, त्यांनी मकरंद शेट्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे यांच्याशी संपर्क साधून मुलांना सुपूर्द करावे. त्या मुलांना पुढील संगोपनासाठी बालसुधाग्रहात पाठवण्यात येईल. अशा प्रकारे कोणत्याही चौकात मुलांना सोडू नये, अशा प्रकारे सोडल्यास एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याची पालकांनी खबरदारी घेणे, हीच काळाची गरज आहे.