साेलापूर : देशातील प्रथम ब्रिज कम बंधारा रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून तिऱ्हे येथे होत आहे. भविष्यात देखील तिऱ्हे गावाच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. उत्तर तालुक्याचा विकास हाच आपला ध्यास आहे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे येथे सुमारे ०७.५० कोटी रूपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष राम जाधव, अतुल गायकवाड, संग्राम पाटील, विशाल जाधव, ज्ञानेश्वर बंडगर,महेश पवार,नंदू पवार,राजू सदगर आदी उपस्थित होते.
आ. देशमुख पुढे म्हणाले की, तिऱ्हे गावाच्या तरुणांनी व्यवसायासाठी महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्यावा, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना घराघरात पोहोचव्यात, विकासकामासाठी कोणतीही मदत लागली तर आपण सदैव तयार आहोत.
यावेळी तिऱ्हे-हिरज रस्ता 3 कोटी 50 लाख, तिऱ्हे- कवठे रस्ता 2 कोटी 25 लाख , तिऱ्हे-शिवणी रस्ता 1 कोटी 45 लाखव यासह इतर विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला.