सोलापूर/शिवानंद जाधव
उत्तर सोलापूर तालुक्यातील श्री संत आप्पाजी महाराज मंदिर संस्थान तसेच तिऱ्हे ग्रामस्थ यांच्या वतीने सुरू असलेल्या रामायणातील लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा गुरुवारी, २८ डिसेंबर रोजी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.
दुपारी ०३ वाजता गावातील ग्रामदैवत म्हसोबा मंदिरापासून टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली. ही दिंडी संपूर्ण गावातून सर्व भाविक भक्तांच्या उपस्थित काढण्यात आली.त्यानंतर सायंकाळी ०५.३० वाजण्याच्या सुमारास रामायण ग्रंथ वाचण्यास सुरुवात करण्यात आली. सकाळी ०६ वाजेपर्यंत हे वाचन करण्यात आले.
यावेळी पंचक्रोशीतील लोकांनी वाचक सूचक म्हणून हजेरी लावली. तद्नंतर लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा संपन्न झाला, शेवटी आरती आणि पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी शिरापूर, टाकळी,शिवणी, पाथरी, मनगोळी, तेलगांव, गावडी दारफळ, कातेवाडी आदी गावातील लोकांनी कडाक्याच्या थंडीतही हजारोंच्या संख्येने हजेरी लावल्याचे दिसून आले.