मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील लोभाजी शेटे यांच्या वारस म्हणून त्यांच्या ५ मुलींच्या नावाची नोंद आहे. त्यांनी वारसा हक्काने धारण केलेली क्र. ८८/१/व/१/अ या मधील १.९६ हेक्टर जमीन कल्पना दळवी, राजश्री गोरे, मनिषा लोखंडे आणि शोभा हिल्लाळ यांच्या हिश्याची जमीन समिर शिवाजी चव्हाण यांना खरेदी दिली.
खरेदीदार समीर चव्हाण हे लेबर ऑफिसर असून, त्यांच्या सौभाग्यवती फॉरेस्ट ऑफिसर आहेत. त्यांनी खरेदी घेतलेले क्षेत्र न मोजता मंगल दिगंबर शेटे यांचेही क्षेत्र ते अनाधिकाराने वहिवाटत आहेत. त्यास कंटाळून अल्पशिक्षित मंगल शेटे यांनी मोहोळ तहसील कार्यालयाकडे पाठपुरावा केला, मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने सर्वच बहिणींनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बैठा सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे.
या बैठा सत्याग्रह आंदोलनात आमच्या प्रकृतीचं काही भले- बुरं झाल्यास त्यास सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं बैठा सत्याग्रह करीत असलेल्या सर्व भगिनींनी म्हटले आहे.