'जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत इलेक्शन नाही' अशी भूमिका
सोलापूर : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाची मागणी करीत सुरू असलेले शांततामय आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अमानुष महिला, लहान मुले अन् आंदोलक तरुण गंभीर जखमी झाले. या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने, रास्ता रोको आंदोलने सुरु आहेत. 'मराठा समाजाला आरक्षण नाही, तोपर्यंत इलेक्शन नाही' अशी भूमिका सकल मराठा समाजाने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनात माऊली पवार यांनी मांडली.
अंतरावली-सराटी येथे पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीहल्ल्यात आंदोलकांसह महिला-लहान मूलंही जखमी झाले. त्यावर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमठत असून, रविवारी, ०३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. पुणे महामार्गावरील बाळे ब्रिजवर सकल मराठा समाज, सोलापूर च्या वतीने रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. त्या हाकेला प्रतिसाद म्हणून मराठा समाजातील विविध पक्षाचे स्थानिक पातळीवरील नेते- पदाधिकाऱ्यांबरोबरच मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे शांततामय मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करीत होते. ते आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करत गोळीबार केला. या लाठीहल्ल्यात महिला, अबाल- वृध्द आंदोलनातील सहभागी निष्पाप स्त्री ,पुरुष, तरुण, तरुणी, लहान मुले,यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्याचा निषेधार्थ सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा यांच्या तर्फे संपूर्ण जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करून शासनाचा निषेध करण्यात आला.
ह्या शासन पुरस्कृत हल्ल्याचा निषेध करण्यासाठी पुणे महामार्गावर बाळे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. यावेळी बोलताना माऊली पवार यांनी वरील भूमिका मांडली. 'जोपर्यंत आरक्षण नाही, तोपर्यंत इलेक्शन नाही.असा मराठा समाजाने ठराव करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, अशोक निंबर्गी, बाबा करगुळे, विनोद भोसले, शिवसेनेचे शहर अध्यक्ष विष्णू कारमपुरी, जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम बरडे,
संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे, शिवाजी तात्या वाघमोडे, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, राजन जाधव, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, गणेश देशमुख, बिज्जू प्रधाने, नाना काळे, राजुभाई कुरेशी, मतीन बागवान, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, निर्मला शेलवणे, मनीषा नलावडे, लता ढेरे, डॉ. चव्हाण, कस्पटे, महादेव गवळी, रामकाका जाधव, लहू गायकवाड, आबा सावंत, चव्हाण शेठजी, हेमंत पिंगळे, शाहू सलगर, प्रकाश ननवरे, पात्रे पैलवान, तिरुपती परकिपंडला, शिवाजीराव घाडगे गुरूजी, सुनील हुंबे, प्रताप कांचन, सुनील नागणे, चंद्रकांत शिंदे, यशवंत लोंढे, प्रताप चव्हाण, शक्ती सुरवसे, श्याम गांगर्डे, चंद्रकांत पवार, राजू पवार, लक्ष्मण पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित नेत्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना शासनाचा निषेध करून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी बोलताना विविध जाती धर्माच्या लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाठिंबा दिला.