मराठा सेवा संघ
वैभवशाली भारतासाठी आशेचा किरण
एकीकडे जातीय धर्मांध कट्टरवादाचे जहाल विष तर दुसरीकडे पुरोगामी च्या नावावर टोकाची भूमिका यातून होणाऱ्या जातीय धार्मिक संघर्षरुपी रोगाने तीन दशकांपूर्वी भारताचं सामाजिक जीवन होरपळून निघत होतं, परंतु ०१ सप्टेंबर १९९० ला मराठा सेवा संघाची स्थापना ही या रोगावरील नव संजीवनी च्या रुपाने या देशाला वरदान ठरली. मराठा सेवा संघाच्या वैचारिक क्रांतीने जातीय धार्मिक अंधश्रद्धेच्या दंगलरुपी रोगातून देशाला दंगल मुक्त करुन प्रगतीची नवी दिशा दिली.
आधुनिक युगातील महान पुरोगामी चळवळ 'मराठा सेवा संघ' या नावाने फार विचारपूर्वक छत्रपती शिवरायांच्या सैन्यातील अठरापगड जातीतील मावळा म्हणजे मराठा या व्यापक अर्थाने ०१ सप्टेंबर १९९० ला पुरुषोत्तम खेडेकर या धेय्यवेड्या माणसाने उच्च विद्या विभुषित लोकांना संघटीत करुन मराठा सेवा संघ या चळवळीच रोपटं लावलं, बघता-बघता या रोपट्याचा वटवृक्ष झाला, या वटवृक्षाच्या फांद्या ३३ कक्षाच्या रुपाने विस्तारल्या.
भारतीय समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या विवेकी लोकांना संघटीत करुन या वटवृक्षाचा विस्तार झाला. जणू एका नव्या युगाची सुरुवात या युगपुरुषाने केली. समाजजागृतीसाठी साहित्य लेखन करुन पुरोगामी विचाराची बहुजन समाजात पेरणी केली. मराठा सेवा संघ या मातृसंघटनेच्या अधिनस्त ३३ कक्ष समाजोन्नतीचा हा गाढा जोमाने पुढे नेत आहे. त्याची थोडक्यात ओझरती ओळख करुन घेऊ या.
संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेड या नावाने तरुणांच संघटन उभं करण्यात आलं. या कक्षाच्या रुपाने देशपातळीवर विधायक असे कार्य सुरु आहे. या देशातल्या तरुणांना समाज विघातक, धार्मिक विद्वेष, कट्टरवाद धार्मिक दहशतवादाच्या जहरीली विळख्यातून, मादक पदार्थाच्या व्यसनातून परावृत्त करुन त्यांच्या भावी आयुष्याची होणारी राखरांगोळी रोखून, तरुणांच्या जीवनात त्याच्या भविष्याची नवी सोनेरी पाहाट आणण्याचं व देशामध्ये जाती धर्मातील सलोखा व बंधुभाव राखण्याचं, महिलांच्या रक्षणाचं प्रसंशनीय कार्य संभाजी ब्रिगेड करत आहे.
०० टक्के राजकारण १०० टक्के समाजकारण हे धेय्य डोळ्यासमोर ठेऊन देशाच्या प्रगतीच व जनतेच्या सुखशांतीच एकमेव सुत्र "शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि नशामुक्त गाव" हे ब्रिदवाक्य घेऊन वाटचाल करत आहे. जनतेने संभाजी ब्रिगेड ला राजकीय संधी अवश्य द्यावी. देशाच्या प्रगतीसाठी संभाजी ब्रिगेड ची ब्लु प्रिंट तयार आहे.
संभाजी ब्रिगेड च्या नजरेतील भारत घडविण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकिय क्षितिजावर एका नव्या मंगलमय पहाटेचे स्वप्न साकारण्यास जनता-जनार्धनाच्या आशीर्वादाने सर्व शक्तीनिशी जनतेच्या सेवेस समर्पित आहे. संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला सुखी संपन्न प्रगतीशील आदर्श देश घडविण्याचे धेय्य डोळ्यासमोर ठेवले आहे. ते पूर्णत्वास नेण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या तमाम जनतेला सहकार्य करण्याचे आव्हान करीत आहे. संभाजी ब्रिगेड च्या नजरेतील अधोरेखीत धेय्य व उद्दिष्ट उदंड आत्मविश्वासाने जनतेसमोर घेऊन येत आहे.
शेतकरी, सर्वात प्रथम जगाच्या पोशिंद्यावर या व्यवस्थेनं गळ्यात फास घेण्याची वेळ आणलेली आहे. यातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची बिनाशर्त सरसकट कर्जमाफी करुन त्याच्यावर कर्ज घ्यायची वेळच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणार यासाठी यथाशिघ्र स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करुन शेतमालाला हमीभाव देणे, शेतकऱ्यांना शेतात जाण्यास प्रत्येक शेतासाठी पक्के रस्ते बांधणे, नदीजोड प्रकल्प राबवून बारमाही पिकांसाठी शेतात मुबलक पाणी व सिंचनाची सोय करण्यात येऊन दुष्काळावरील कायमस्वरुपी उपाय योजणे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास मोफत विज देणे. शेतकऱ्यांना यापुढे बँकांकडून कर्ज घ्यावे लागणार नाही, त्याऐवजी सरकारकडूनच हेक्टरी १ लाख रु. अनुदान देण्यात येऊन यापुढे एकही शेतकरी कर्जबाजारीमुळे आत्महत्या करणार नाही, याची व्यवस्था करणे. भुमीहीनांना शासकीय जमिनीतून हक्काचे पक्के पट्टे देणे, आदीवासींचा त्यांच्या जल जमीन जंगलावरचा अधिकार कोणीही काढू शकणार नाही, असा कडक कायदा करणे तसेच वनहक्क कायद्यातील तिन पिढ्याची अट रद्द करुन शेतकऱ्याचा हक्क कायम करणे,
बेरोजगार, युवक युवतींना लघुउद्योगाकरीता १० लाखापर्यंत बिना जामीन बिना तारण कर्ज देण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक बेरोजगार कुटुंबाला किमान १८ हजार रुपये वेतन मिळेल अशी रोजगाराची हमी देणे, ७० टक्के च्या वर नैसर्गिक अपंगत्व असणाऱ्या सर्व बेरोजगारांना १० हजार रुपये दरमहा मदत देऊन बेरोजगारीवर १०० टक्के उपाय करुन कोणीही बेरोजगार असणार नाही. याची हमी देणे यासाठी संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे.
शिक्षण व्यवस्थेवरच देशाचं भविष्य ठरत असते. तेव्हा KG ते PG पर्यंतचे सर्व शिक्षण सक्तीचे दर्जेदार व पदवीपर्यंत मोफत तथा प्रत्येक ग्रामीण भागातील अंगणवाडी सरकारी शाळांचा काॕन्हेटच्या धर्तीवर दर्जेदार इंग्रजी माध्यमातून इंग्रजी शिक्षण देण्यासाठी प्रत्येक शाळेत शिपाई क्लर्क प्रत्येक विषयासाठी प्रशिक्षित तज्ञ शिक्षकांची भरती करणे, शिक्षकांना करावी लागणारी १५० च्या वर अशैक्षणिक कामे बंद करणे, जीवनोपयोगी वैज्ञानीक दृष्टीकोनाने परीपूर्ण असलेला अभ्यासक्रम राबविण्यात येऊन जागतिक दर्जाची विद्यापीठे निर्माण करणे त्यासाठी आम बजेटच्या २५ टक्के शिक्षण क्षेत्रासाठी खर्च करण्यास, सर्व विद्यार्थ्याना मोफत प्रवास पास, जिल्ह्याच्या ठिकाणी मोफत जेवण, निवासासाठी वसतीगृहाची सोय करण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध असणार. ओबीसींसह सर्व जातीची जातीनिहाय जनगनना करुन त्यांच्या प्रमाणात सरकारी नोकरीतील भागीदारी व अनुशेष भरुन काढून आरक्षण व आम बजेटमधील वाटा मिळवून देण्याची हमी. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कुणावरही अन्याय न करता मराठा समाजासाठी स्थायी आरक्षणाची तरतुद करुन मराठा समाजाला त्याचे हक्क व अधिकार मिळवून देणे. संभाजी ब्रिगेड शिवधर्माच्या महान मानवतावादी तत्वज्ञानाच्या आधारे धार्मिक तथा जातीय दंगलींचे समुळ उच्चाटन करणे व जगातील सहिष्णू वा शांतीप्रिय देश म्हणून भारताची ओळख निर्माण करणे.
अ दर्जाच्या सर्व धार्मिक स्थळांचे सुरक्षेच्या दृष्टीने राष्ट्रीयकरण करण्यात येऊन त्याच्या उत्पन्नातून शिक्षण आरोग्य दारिद्रय निर्मुलन कुपोषण सारख्या लोककल्याणकारी योजना राबवून भारताला महासत्ता बनवणे. प्रत्येक गांव स्मार्ट व्हिलेज करणे, बेघर किंवा कच्चे घर असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचे सर्व सुविधायुक्त पक्के घर देणे, दिल्ली च्या धर्तीवर दर्जेदार डिजीटल शाळा, प्रत्येक गावात गावालगतची सरकार जागा खरेदी करुन सार्वजनिक उद्यान, प्रत्येक गावात सार्वजनिक वाचनालय, खेळासाठी क्रीडा संकुल, २४ तास वीज, शुद्ध पिण्याचे पाणी, पक्के काॕक्रिट रस्ते, पक्की सांड-पाण्याची व्यवस्था, प्रत्येक घरी संडास, धुरविरहीत स्वयंपाकघर, महिलांच्या सक्षमिकरण व सुरक्षिततेसाठी ठोस उपाय योजणे, मुलींच्या शिक्षणासाठी व सर्वांग विकासासाठी सर्व सुविधा मोफत करणे, सर्व सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालयाची सोय करणे, महिलांना आत्मसंरक्षणासाठी व आत्मनिर्भयतेकरीता प्रशिक्षण व अर्थसहाय्य देणे, महिला बचतगटांना लघुउद्योगासाठी अल्पव्याजदरात कर्जपुरवठा करणे, निर्व्यसनी समाज हिच देशाची खरी ताकद असते. जो निर्व्यसनी तो सुखी हे निसर्गाच सुत्र आहे. तेव्हा संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात संपूर्ण देशात दारुबंदी करण्यात येऊन दारुची कारखाने व दारु तस्करांना कायमस्वरुपी हद्दपार करावी, यासाठी संभाजी ब्रिगेड आग्रही आहे.
आयुष्याचा शेवट हा सुखकर व्हावा, यासाठी सर्व जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व वृद्धापकाळ २ हजार पेन्शन देण्यास कटीबद्ध. जातीभेद हा देशाला लागलेला कलंक आहे तो धुवून काढणे हे संभाजी ब्रिगेडचं स्वप्न आहे. या जातीभेद निर्मुलनाकरिता आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन नवदांपत्याला ५ लाख रु.मदत देणे. पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी ताडोबा सारख्या महाराष्ट्रासह देशातील सर्व व्याघ्र प्रकल्प असलेल्या अभयारण्याला जागतीक दर्जाचे पर्यटन स्थळे तयार करणे, आपले ऐतिहासिक धरोवर असलेले सर्व ऐतिहासिक गड किल्ले व वास्तुंचे संवर्धन करुन पर्यटनासाठी विकसित करणे सर्व ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्यास संभाजी ब्रिगेड कटीबद्ध आहे.
मच्छीमारांच्या समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्रासह देशातील सर्व धरण नदी तलाव सागर यासारख्या जलस्त्रोतांवर स्थानिक मच्छिमारांना मच्छिमारीचे अधिकार देणे. आरोग्याच्या प्रत्येक नागरीकाला उत्तम सोयी देणे ही सरकारची जबाबदारी असते तेव्हा "आरोग्य माझा हक्क" ही योजना तयार करुन महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक सरकारी रुग्णालयात डायलेसिस पासूनच्या सर्व सोयी मोफत पुरविणे हा प्रत्येक नागरीकाचा हक्क पूर्ण करणे,
ग्रामीण जनतेच्या सेवेत कसूर न राहावा यासाठी सर्व ग्रामीण कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयी सरकारी क्वाॕर्टर बांधून देणे, विकासाच्या तथा प्रशासनाच्या दृष्टीने छोटी राज्य, जिल्हे, व तालुके निर्मितिला प्राधान्य देणे, दुर्गापूर सारखी थर्मल पावर स्टेशन्स, एम आय डी सी, कोल माइन्स, धरणांकरीता शेतकऱ्याच्या कवडीमोल किंमतीत जमीनी आवंटीत केलेल्या आहे, परंतु त्या उपयोगात न आणता तशाच पडून असेल तर अशा जमीनीचा फेरआढावा घेऊन त्या शेतमालकाला परत करणे. खाजगीकरण म्हणजे देशाची सार्वभौमक्ता नष्ट करणे होय. तेव्हा खाजगीकरणाला पूर्णता पायबंद घालून शाळा काॕलेजेसपासून सर्व स्रोतांचे सरकारीकरण करणे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी कठोर कायद्याची निर्मिती करण्यात येवून सर्व भ्रष्टाचारांकडून देश विदेशातून काला धन सरकार जमा करुन कडक कायदेशीर कारवाई करणे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद

जिजाऊ ब्रिगेड
जिजाऊ ब्रिगेड हे एक महिलांच्या उत्थानाकरिता उभारण्यात आलेलं संघटन आहे.
कोणत्याही समाजरुपी रथाची दोन चाके पुरुष आणि स्त्री असून, ही दोन्ही चाके सारखी गतीमान असेल तरच समाज वेगाने पुढे जाऊन प्रगती करु शकतो, हे त्रिकाल सत्य डोळ्यापुढे ठेऊन, या वर्ण-व्यवस्थी समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्रीला गुलाम करुन अनेक बंधनात बांधून ठेवले. या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त, सुदृढ व सशक्त करण्यासाठी मराठा सेवा संघाने स्त्रियांचं संघटन "जिजाऊ ब्रिगेड" कक्ष स्थापन करुन स्त्रीयांना आपल्या गुलामगिरीची जाणीव करुन दिली. धार्मिक बंधनातून व कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाच्या माध्यमातून वैचारीक लढा उभारला आहे. स्त्रीयांवरील अन्याय-अत्याचाराला वाचा फोडून स्त्रीसक्षमिकरणाचं कार्य मोठ्या प्रमाणात या कक्षद्वारा सुरु आहे.
आज तिच्या बंधनाच्या प्रतिकाने अलंकाराची जागा घेतली, परंतु हे तिच्यावर लादलेली बंधने आहेत. स्रीला शुद्राचा दर्जा दिला गेला. तिच्यावर शिक्षणबंदी लादली गेली. तिला उपभोगाची वस्तु तथा चुल आणि मुल एवढ्यापुरतीच सिमीत करुन ती कधी स्वतंत्र होणारच नाही, यासाठी भाकड पोथीपुराणे रचून तिच्यामागे उपास-तापास कर्मकांडे लादली गेली. तिथूनच या देशाच्या अधोगतीला सुरुवात झाली.
स्री सक्षम असेल तरच समाज वेगाने पुढे जाऊन प्रगती करु शकतो. आजही ज्या घरात स्री स्वतंत्र आहे, स्रीला सन्मान आहे,स्री प्रमुख आहे, ते घर सुखी समृद्धच दिसेल. मातृसत्तेच हे त्रिकाल सत्य डोळ्यापुढे ठेऊन, या वर्णव्यवस्थी समाजव्यवस्थेने हजारो वर्षापासून स्त्री ला गुलाम करुन अनेक बंधनात बांधून ठेवले. या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त, सुदृढ व सशक्त करण्यासाठी व तिला या शोषक धर्माच्या विळख्यातून बाहेर काढून शिवसंस्कृतीतील गतवैभव शिवधर्माच्या माध्यमातून राष्ट्रमाता राजमाता माॕ. जिजाऊंना उत्तुंग मातृत्वाचं प्रेरणास्थान मानून स्रीयांना गतवैभव मिळवून दिलं. 
मातृशक्तीच या देशाला महासत्ता बनवू शकते, या विश्वासाने मराठा सेवा संघाने स्त्रियांच संघटन "जिजाऊ ब्रिगेड" कक्ष स्थापन करुन स्त्रीयांना आपल्या गुलामगिरीची जाणीव तथा धार्मीक बंधनातून व कर्मकांडाच्या, अंधश्रद्धेच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी जिजाऊ ब्रिगेड या कक्षाच्या माध्यमातून वैचारीक लढा उभारला. स्त्रीयांवरील अन्याय अत्याचाराला वाचा फोडून स्त्रीसक्षमिकरणाचं कार्य मोठ्याप्रमाणात या कक्षाद्वारा सुरु आहे.
विश्वाची अर्धी शक्ती ही स्री शक्ती असून या शक्तीला जगातल्या एकाही धर्माने अग्रस्थान सन्मान दिलेला नव्हता. उलट स्री शक्तीला काही धर्मांध्यांनी वाळीत टाकले होते, परंतु मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवधर्माच्या प्रकटनाने आपल्या प्राचीन मातृसत्ताक बळी, सिंधु, शिव संस्कृतीचं पुनर्जीवन करुन विश्वातला असा एकमेव असलेला शिवधर्म की, ज्यात मातृसत्तेचं प्रतिक जिजाऊंच्या रुपाने विश्वाची जननी स्री हेच आपलं प्रेरणास्थान माणून माहिलांना सर्वाधिकार व अग्रस्थान देणारा जगातला पहिला धर्म "शिवधर्म" ठरला आहे.
आज शिवधर्मानुसार महिला आचरण करित असून त्यांनी आपल्या घरातून या शोषक पुरोहितांना हद्दपार केले आहे. प्रत्येक संस्कारामध्ये पुरोहिताची भुमिका महिला स्वतः पार पाडत असून धार्मिक गुलामीतून स्री मुक्त झाली आहे. जिजाऊ ब्रिगेड च्या माध्यमातुन घराघरात शिवधर्माच आचरण व्हाव यासाठी प्रयत्न होत आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद (PDRSP)
समाजाला योग्य दिशा देणाऱ्या व देशाचा आधारस्तंभ असलेली सक्षम भावी पिढी घडवणाऱ्या आदर्श शिक्षकांच संघटन.
शिक्षण तज्ञांचं संघटन.
समाजाच्या प्रगतीला पोषक असे शिक्षण मिळण्यासाठी शैक्षणिक धोरणाबाबत अभ्यास करुन त्याप्रमाणे शासनास मार्गदर्शन करण्याचे, चुकिच्या धोरणाला विरोध करुन त्याचे होणारे दु:ष्परिणाम सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम हा कक्ष करीत आहे.
वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद (VBVP)
कृषिरत्न विखे पाटील कृषी कक्ष

महाराजा सयाजीराव गायकवाड न्यायदान कक्ष
संगीतसुर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषद
जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद कक्ष
आपल्या महान संतांचे विचार व त्यांच्या साहित्याचा प्रसार करणाऱ्या प्रचारकांचं संघटन.
या देशात आर्यांच्या आक्रमणानंतर सिंधु संस्कतीचा ऱ्हास करण्यात आला. या देशात तक्षशिला, नालंदा.... सारखी जगप्रसिद्ध अशी विश्वविद्यापीठे होती. जगातून विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येत एवढी समृद्ध शिक्षण व्यवस्था या देशात होती. त्यामुळेच आपला देश सिंधु संस्कृतित सुखी समृद्ध होता, म्हणूनच तर भारताला सोन्याची चिडीयॉ म्हणत. परंतु या विदेशी आर्यवैदिकांनी ही विश्वविद्यालये व ग्रंथ भांडार जाळून खाक केले, पुढे वर्ण व्यवस्था निर्माण करुन सिंधुजनांना शिक्षणबंदी करुन आर्यवैदिक यांनी शिक्षण क्षेत्र आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी आपल्या सोईनुसार साहित्ये निर्मिती केली. 
अनेक कलोकल्पित पोथ्या पुराणे लिहून आपला सिंधुजनांचा समृद्ध वारसा दुषित केला. आज आपल्या समृद्ध वारशाच्या सत्य इतिहासाचे संशोधन व लेखन करणे, खरा इतिहास आपल्या समाजापर्यंत पोहोचवणे, महापुरुषांचे, संतांचे विचार साहित्याचा प्रचार-प्रसार करणे, स्वत:चं साहित्य निर्माण करणे, प्राचीन साहित्याचा चिकित्सक अभ्यास करुन समाजापुढे विश्लेषक मांडणी करणे, नवोदितांना साहित्ये निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्याचे कार्य जगदगुरु तुकोबाराय साहित्ये परिषद या कक्षाद्वारे अविरत सुरु आहे.
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शक कक्ष
क्रांतिसिंह नाना पाटील मराठा वधु-वर सुचक व सामुहिक विवाह कक्ष
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष
ज्या देशाचा नागरिक दुर्बल तो देश दुर्बल. या देशाला बलशाही बनविण्यासाठी या देशाचा युवक हा निर्व्यसनी असावा, यासाठी राष्ट्रसंतांनी आदर्श मानवी जीवनाच्या संहितेच ग्रामगीतेच्या रुपाने आपल्या जीवनाचं संविधानच जणू राष्ट्रसंतांनी आपल्याला उपलब्ध करुन दिलं. त्यांनी भजनांच्या माध्यमातून समाजाला व्यसनमुक्त करण्यासाठी मार्मिक भजने लिहीली व स्वतः गाऊन समाजाला व्यसनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे व्यसनांचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत आहे. शाळकरी मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत तंबाखू गुटखा बिडी सिगारेट दारु चरस भांग गांज्या....आदी मादक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. शासन प्रशासन वर-वर व्यसनमुक्ती जनजागृतीचे कार्यक्रम राबवित असल्याचे भासवते, परंतु मुळात मादक पदार्थाचे स्रोत मात्र कायमस्वरुपी बंद करत नाही. कारण सरकारला जनतेच्या आरोग्याची नाही तर महसुलाची चिंता आहे. यामुळेच व्यसनाचे प्रमाण वाढत असून दारिद्र्यात अनारोग्यात वाढ झाली असून देशाचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
आमचा विश्वास आहे की, दहा वर्ष रस्ते नाही बणले, विकासाची कामे नाही झाली, तरी चालेलं परंतु सरकारने ही अंम पदार्थाची- दारुची कारखाने बंद केली, या सर्व अंमली पदार्थाच्या स्त्रोतांवर कडक अंकूश बसवला तर प्रत्येक घर सुखी होईल, पर्यायाने देश सुखी होईल.
"निर्व्यसनी समाज सुखी समाज" हे राष्ट्रसंतांचं अधुरं राहिलेलं स्वप्न मराठा सेवा संघ प्रणित "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसन मुक्ती कक्षाद्वारा" व्यसनमुक्ती शिबिरे, पथनाट्यासारखे कार्यक्रम आयोजित करुन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच काम राष्ट्रीय स्तरावर सुरु आहे.
संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषद
संत नामदेवांनी आणि संत तुकारामांनी एवढं प्रभावी शस्त्र आपल्या जीवनाच्या कल्याणासाठी दिलं, परंतु अजूनही त्या अभंग रुपी गाथेचा आपल्या कल्याणासाठी आपण उपयोग करुन घेऊ शकलो नाही, तेव्हा त्यांच्या महान साहित्याचा व विचारांच्या जाणकारांचं संघटन संत नामदेव-तुकाराम वारकरी परिषद या कक्षाद्वारे त्यांचं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.
महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकार कक्ष
संत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष
मराठा मार्ग कक्ष
महात्मा जोतिबा फुले इतिहास अकादमी
डॉ. रुखमाबाई राऊत आरोग्य कक्ष
मन मनगट आणि मेंदू हे तीन 'म' ज्या माणसाचे सशक्त आणि सुदृढ असेल तोच माणूस आपल्या जीवनात क्रांती किंवा प्रगती करु शकतो, यासाठी निरोगी शरीर हेच खरं धन आहे. बहुजन समाजाचं स्वास्थ जपण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या डाॕक्टरांचं संघटन भारताच्या पहिल्या महिला डाॕक्टर... डॉ. रुखमाबाई राऊत यांच्या नावाने हा कक्ष कार्य करत आहे.
तानुबाई बिरजे पत्रकार परिषद
प्रामाणिक पत्रकारांचं संघटन.
निर्भय निरपेक्ष पत्रकारिता म्हणजे सुदृढ लोकशाहीचे लक्षण ! आज भारतीय लोकशाहीचे संसद, प्रशासन, न्यायपालिका आणि मिडीया चारही स्तंभ कमजोर आणि खिळखिळे झाल्याचे जाणवत आहे. ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह? प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह?न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह? पत्रकारीतेवर प्रश्नचिन्ह? यावरुन ह्या चारही स्तंभाला सत्ता आणि पैसा याचा गंज लागला असून ही लोकशाहीची इमारत कोसळते की काय? अशी भिती निर्माण झाली आहे. या चारही स्तंभाने सत्तेपुढे घुटणे टेकल्याची जाणीव प्रत्येक सुज्ञ नागरिकाला होत आहे.
चौथा स्तंभ मिडीया अतिशय महत्त्वाचा आहे, कारण इतर तिन्ही स्तंभावर याचा प्रभाव पडत असतो. त्याचप्रमाणे मिडिया प्रिंट असो की इलेक्ट्रॉनीक असो विशेष म्हणजे समाज मनावर गहरा प्रभाव पाडत असतो. त्यामुळे या स्तंभाची जबाबदारी देशामध्ये शांतता सहिष्णुता, प्रेम, बंधु-भाव ही मुल्यं जपण्याचे काम मिडीया याच स्तंभावर आहे.
या मुल्यावरच लोकशाही उभी आहे. जर का मिडीया धर्म, जात, पंथ, पक्ष, निरपेक्ष नसेल, तर या मुल्यांना तडा जाऊन देशाची काय परिस्थिती होईल, याची कल्पना करणेच कठीण. तीच भिती आजची परिस्थिती बघता वाटते. भर दिल्ली दरबारात संविधानाला जाळणाऱ्या शक्ती संविधान बदलविण्याची भाषा करतांना दिसते. प्रत्येक घटनेत धर्मांध शक्ती धार्मिक द्वेषाचे जहर पेरतांना दिसते. ज्या महापुरुषांनी या देशाला एकसंघ ठेवण्यासाठी बलिदान दिले, त्यांच्या खूनाची तहान अजूनही भागली नसणारे त्यांच्या प्रतिमांवर गोळ्या झाडतांना दिसतात. साधुच्या वेषातले आतंकवादी शस्त्र प्रदर्शन करतांना दिसतात. तेव्हा या देशाचे भविष्य धोकादायक अंध:काराच्या गर्द छायेत दिसायला लागते. या निराशेच्या छायेतही नितीमूल्यांनी परिपूर्ण एखादा पत्रकार बघून कुठं तरी आशेचा किरण दिसतो. या किरणाचा प्रवास किती खडतर असतो, हे सुद्धा समजून घेण्यासाठी भक्तांनी भक्ती त्यागून निरपेक्ष समजून घेणे तेवढेच महत्वाचे असते.
आज मिडीयावर मनुवाद्यांची मालकी व कब्जा असल्याने अशा निर्भिड सच्च्या पत्रकारांना कशा प्रकारे वाळीत टाकलं जातं, याचा पदो-पदी प्रत्यय येतो. प्रसार माध्यमं विसरेल, परंतु सुज्ञ जनता मात्र त्यांचे कार्य कधीच विसरणार नाही.
जेव्हा-जेव्हा पत्रकारितेचा विषय येईल, तेव्हा-तेव्हा अशा पत्रकारांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कारण कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कोणतेही राजकीय विश्लेषण असो, कोणतीही घटना असो तिचे अभ्यासपूर्ण सटीक असं निर्भय-निरपेक्ष विवेचन करुन सत्य हकिकत जन-माणसांपर्यंत पोहोचवणारी पत्रकारिता आणि पत्रकार फारच दुर्मिळ असतात. हे कार्य पार पाडत असतांना त्याच्यापुढे संकटांचा डोंगर उभा असतो, परंतु असा पत्रकार कसल्याच संकटाला भिक घालत नसतो. अशा निर्भिड पत्रकारांचं संघटन असणे काळाची गरज आहे, हे स्वप्न पूर्ण करण्याचे काम तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष करीत आहे.
प्रचार-प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. हा स्तंभ जर भ्रष्टाचारानं पोखरला तर लोकशाही डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सामाजिक, आर्थिक, राजकिय क्षेत्रात तटस्थपणे भूमिका बजावणाऱ्या प्रामाणिक पत्रकारांची लोकशाही वाचविण्यासाठी देशाला गरज आहे. अशा लोकशाही मुल्याचं संवर्धन करण्याचं काम तानुबाई बिरजे पत्रकार कक्ष करीत आहे.
महाराणा प्रताप बालकल्याण कक्ष (विद्यार्थी दत्तक कक्ष)
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विश्व शाहीर परिषद
शाहीर कलाकारांच संघटन.
शाहीरी हे लोककलेच उत्तम असं जनजागृतीच साधन आहे. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांना आपल्या शाहीरीद्वारा रशियापर्यंत जगात पोहचविले. या कक्षाद्वारा समाज जागृतीचं काम प्रभावीपणे करण्यात येत आहे.
अशाप्रकारे मंत्रालय कामकाज कक्ष, डॉक्टरांचं संघटन आरोग्य कक्ष, अभियंत्याचे संघटन, खेळाडूंचे संघटन, अधिकाऱ्यांचं संघटनं, शिवराज्य पक्षाच्या माध्यमातून राजकिय पदाधिकाऱ्यांचं संघटन...इ. आपापल्या कक्षाद्वारा समाजोद्धाराचे कार्य करत आहे. लेखप्रपंच वाढत असल्यामुळे विस्ताराने न घेता थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
मानवी जीवनामध्ये धर्म ही मुलभूत गरज नसली तरी धर्माचे स्थान संवेदनशील बणविले गेले आहे, धर्मरक्षणाच्या नावावर माणूस वाट्टेल ते करण्यास वेळप्रसंगी प्राणही देण्यास एका पायावर तयार होतो. एवढा नाजुक आणि संवेदनशील विषय हाताळतांना 'शिवधर्म गाथेच्या रुपाने इतर धर्माला कसलाही धक्का न लावता सखोल अभ्यासांती सर्व विवेकवादी पुरोगामी सिंधुजनांना आपल्या खऱ्या धर्माचा व संस्कृतिचा परिचय करुन दिला.
कोणत्याही धर्माला धर्म संस्थापकाचे व धर्मग्रंथाचे एक अधिष्ठान असते. जगामध्ये जे-जे प्रचलीत धर्म आहेत, त्यांचा संस्थापक किंवा उपदेशक व आचरणाचा एक विशिष्ट धर्मग्रंथ आहे. त्यामुळेच जागतिक पातळीवर अशा धर्मांची नोंद होऊन मान्यता मिळीली अन् प्रसार-प्रचार झाला. त्यामुळे संपूर्ण जगभरातील प्रत्येक देशात थोड्या फार प्रमाणात त्या-त्या देशातल्या स्थानिकांमध्ये बौद्ध, मुस्लीम, ख्रिच्चन धर्म पाहवयास मिळतो, परंतु हिंदू हा धर्म भारताऐवजी जगात इतरत्र जगातल्या प्राचीन अखंड भारत वगळता इतर देशाच्या स्थानिकांमध्ये दिसत नाही, इतर देशात कोणी हिंदू असेलही ! तरी तो भारतातून गेलेलाच असेल, यावरुन स्पष्ट होते की, हिंदू या धर्माला जागतिक मान्यता नाही. कारण या धर्माचा विशिष्ट धर्मग्रंथ किंवा संस्थापक नाही. त्यामुळे या धर्माचा जगात प्रचार- प्रसार होवू शकला नाही. त्यामुळे हिंदू हा धर्म नसून ती एक संस्कृती, जीवन प्रणाली असल्याचे सर्वोच्च न्यायालय तथा अनेक विद्वानांनी स्पष्ट केले आहे.
आपली ही जीवनप्रणाली महान निसर्गपूजक सिंधु संस्कृती असून ही संस्कृति म्हणजे बळीवंशापासून चालत आलेला शिवाचा खरा शिवधर्म आहे, कालांतराने अपभ्रंषाने किंवा कोणाच्या हिन दुषणं देण्यावरुन सिंधु चे हिंदु असे प्रचलन झाले ! पुढे आर्य वैदीकांनी या महान संस्कृतीवर आक्रमण करुन होम, हवन, बली, यज्ञासारखी अंधश्रद्धेची कर्मकांड घुसडवून ही संस्कृती विद्रुप केली, याला विरोध करणाऱ्या आपल्या महापुरुषांचे कपटाने खून केले गेले, त्याच्यावर काल्पनिक कथा रचून कपोकल्पित साहित्ये तयार केले गेले, त्याद्वारे आपल्याला मानसिक गुलाम करुन श्रद्धेच्या, आस्थेच्या नावावर आपली लुट सुरु केली. आम्ही आमच्या घामाचा, कष्टाचा मेहनतीचा पैसा पोटाला चिमटा मारुन मंदिराच्या दानपेट्यात दान म्हणून भरत गेलो आणि त्यावर हा तीन टक्के शोषक वर्ग शक्तीशाली बनून आपल्यावर राज करत आहे, आजतागायत आपण त्यांच्या शोषणाचे बळी ठरत आहो.
मराठा सेवा संघाची ही क्रांतीकारक पुरोगामी चळवळ ३३ कक्षाच्या माध्यमातून देशाच्या एकतेला, अखंडतेला, धर्मनिरपेक्षतेला, बंधुभावाला, सहिष्णूतेला बाधा पोहचवणाऱ्या शक्तींवर अंकूश ठेऊन देशसेवेचे महान कार्य करत आहे.
मराठा सेवा संघाची उपलब्धी
रामचंद्र सालेकर,
