जिल्ह्यात शस्त्रबंदी-जमावबंदी

shivrajya patra


सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून दिनांक 4 मार्च 2026 रात्री 20.00 वाजलेपासून ते दिनांक 18 मार्च 2026 रात्री 20.00 वाजेपर्यंत या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (अ ते फ) व कलम 37 (3), अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत. असे अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार समाजकंटक व गुंडप्रवृत्ती इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे सोयीचे होईल. तसेच  शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, भाले, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास ईजा करण्याकरीता वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्राही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, 

व्यक्ती अगर त्यांची प्रेत यात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर निती  विरुध्द निरनिराळ्या जाती-जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे कोणताही जिन्नस तयार करुन त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे.

हा आदेश अत्यावश्यक सेवा, तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजाविताना उपरनिर्दीष्ठ वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत, असंही या आदेशात उल्लेखिलं आहे.

To Top