गांवकर्‍यांनी समृद्ध गांव अभियान संकल्पना राबवावीः आ. देशमुख

shivrajya patra

वाडीकुरोलीत सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे वृक्षारोपण

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात नारळाचे गांव म्हणून वाडीकुरोली प्रसिद्ध व्हावे, यासाठी सर्वांनी झाडांचे संगोपन करावे. गाव समृद्ध व संपन्न होण्यासाठी समृद्ध गांव अभियान ही संकल्पना गावकर्‍यांनी एकत्रित येऊन राबवावी. त्यास सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य असेल, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर सोशल फाउंडेशनतर्फे व निर्मलग्राम ग्रापंचायत वाडीकुरोली यांच्या वतीने पर्यावरण दिन सप्ताहानिमित्त राष्ट्रीय महामार्ग ते वाडीकुरोली गावापर्यंत रस्त्याच्या दूतर्फा रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी आमदार देशमुख बोलत होते.

या मोहिमेत झाड आईचं... मायेच्या सावलीचं या संकल्पनेतून गावातील महिलांचा सहभाग घेऊन गावात लावण्यात येणार्‍या प्रत्येक झाडाला घरातील महिलेचं नाव देण्यात आले. लोकसहभागाच्या माध्यमातून गावात  हजार नारळाची झाडे लावण्यात आली.  

यावेळी तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, सरपंच सुनिता काळे, उपसरपंच जनाबाई चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष मंदाकिनी नाईकनवरे,  समाधान काळे व ग्रामपंचायत सदस्यांसह सोलापूर सोशल फाउंडेशनचे अजित कंडरे, मोहन अनपट, गणेश पाटील, श्रीधर यलमार, तानाजी सालविठ्ठल,  अनंता चव्हाण आदी उपस्थित होते.

To Top