पंचशील माणसाला बलवान, धनवान, शीलवान बनवते : घनश्याम वासनिक

shivrajya patra

विचारांच्या आनंदाचा भीम जयंती महोत्सव 

मंद्रूप : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, समतेचे नायक महात्मा बसवेश्वर यांच्या संयुक्त जयंती निमित्त बौद्धजन सेवक संस्था, पुणे व भीमगर्जना प्रतिष्ठान टाकळी यांच्या वतीने पाच दिवसीय धम्म प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमा वेळी घनश्याम वासनिक सर यांनी पंचशील माणसाला धनवान, बलवान, शीलवान बनवते असा उपदेश केला. 

दक्षिण सोलापुरातील टाकळी, औज, कारकल, भंडारकवठा, माळकवठा, विंचूर येथे पाच दिवशीय धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पंचशिलातील प्रत्येक शील हे मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून पंचशिलाच्या आचरणाने माणूस शीलवान बनतो. 

त्रिसरण पंचशील हे युवकांसाठी प्रेरणादायी असून पंचशिलातील पाचही शील हे माणसाला सर्व दुःखापासून दूर करण्याचे कार्य करतात. 

पाणातिपाता वेरमणी माणसाला हिंसा करण्यापासून रोखते. अदिन्नदाना वेरमणी माणसाला सत्यवान बनवते.

कामेसु मिच्छाचारा वेरमणी माणसाला कामवासने पासून दूर करते. 

मुसावादा वेरमणी माणसाला प्रामाणिक बनवते. 

सुरा मेरय मज्ज पमादठ्ठाना माणसाला व्यसनांपासून दूर ठेवते असे मत वासनिक यांनी मांडले.

ॲड. रवी पाटील यांनी सांगितले की, जो माणूस तथागतांवर श्रद्धा ठेवतो, तो गृहस्थी असतो.

जो श्रद्धेला कृतीची जोड देऊन पंचशील म्हणतो, तो उपासक किंवा उपासिका असतो. परंतु जो माणूस त्रिसरण आणि पंचशील यांचे तंतोतंत पालन करतो, तो शीलवान उपासक असतो असे स्पष्ट केले.

बौद्धजन सेवक संस्थेच्या वतीने टाकळी, कारकल, भंडारकवठे, माळकवठा, विंचूर, औज येथील अध्यक्षांचा पाच दिवसीय शिबिर राबविल्यामुळे भारतीय संविधानाच्या प्रतिमा देऊन सन्मान केले. 

तसेच भीमगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने पाच दिवशीय शिबिर राबवण्यासाठी खास पुण्यातून आलेल्या घनश्याम वासनिक, ॲड. रवी पाटील, संजय महाजन, अनुप गडलिंग, सुरेश बनसोडे, संतोष गायकवाड, सतीश शिंदे, विलास गायकवाड यांचा फेटा व पंचशील उपरणे देऊन सन्मान करण्यात आले. 

युवकांना सुमार्गाने वाटचाल करता यावे व लहान मुलांवर धम्म संस्कार घडविण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन केले असून भविष्यात असे अनेक धम्म प्रबोधनाचे कार्यक्रम राबवु असे दृढ आश्वासन चंद्रशेखर गायगवळी यांनी दिले.

यावेळी लक्ष्मी कदम, मीनाक्षी घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या धम्म प्रबोधनाचा सप्ताह यशस्वी करण्यामध्ये आयु. चंद्रशेखर गायगवळी व त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि आयु. भानुदास गायकवाड यांच्या कुटुंबाने मोलाची जबाबदारी पार पाडून सिंहाचा वाटा उचलला. शिवाय आयु. अविनाश शिवशरण यांनी याकामी प्रवचनकारांना कार्यक्रमाच्या इच्छित ठिकाणी जाण्या-येण्यासाठीची जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

या कार्यक्रमास कारकलचे विठ्ठल केंगार, भंडारकवट्याचे प्रशांत तुर्भे, टाकळीचे पुरुषोत्तम गायकवाड, लालसाब बोरगी, राजकुमार गायकवाड, राजशेखर गायगवळी, बोलूशा साबळे, दिलीप चांदकवठेकर, रमेश साबळे, प्रकाश साबळे यांच्यासह महिलांची उपस्थिती उल्लेखनिय होती.

To Top