असबाक ट्रस्ट व समर फाउंडेशन तर्फे शिक्षक पुरस्कारांचे वितरण
शिष्यवृत्ती व अधुरी तखलीक पुस्तकांचं प्रकाशन
श्रीरामपूर : मातृभाषा ही आईची भाषा असते आणि आईच्या मायेने शिकविणारे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. आज ज्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला, त्यांचे कार्य ऐकल्यानंतर निश्चितपणे उर्दू शाळा मधून सुद्धा समाज निर्मितीसाठीचे बाळकडू दिले जातात, हे आनंदाची बाब आहे. समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव होताना मनस्वी आनंद होतो, असं प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी केले.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सचिव आबीद खान, लेखक अजमत इक्बाल, शाहीन शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले की, उर्दू भाषा मला फार कळत नसली तरी ती ऐकायला मात्र गोड असते आणि उर्दूची नजाकत ही माणसाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते.
यावेळी जिल्ह्यातील
मोहम्मद उमर बागवान (खासदार गोविंदराव आदिक ऊर्दू हायस्कूल, श्रीरामपूर),
अनिस मेहमूद शेख (मुख्याध्यापक, जि. प. शाळा ममदापूर),
सौ. नसरीन इनामदार (उपशिक्षिका, नगरपालिका शाळा क्रमांक ५, श्रीरामपूर),
शेख जमीर अहमद याकूब (तंत्रस्नेही शिक्षक, जि. प. शाळा, बेलापूर),
हुसेनाबानो फारुक पटेल (पदवीधर शिक्षिका, जि. प. शाळा अशोक नगर),
लेखिका महेरुन्निसा अब्दुल्लाह खान(उपशिक्षिका, जि. प. शाळा, राहता),
रुबीना ख्वाजा खान (उपशिक्षिका, जि. प. शाळा,शिरसगाव),
मोमीन हुसेन बादशाह महमूद (मुख्याध्यापक जि. प. शाळा खर्डा, जामखेड),
शेख आफरीन मोहम्मद (मुख्याध्यापिका, जि. प. शाळा, समनापुर, संगमनेर) व
शेख नाजेमाबेगम नवाब (उपशिक्षिका-जि. प. शाळा सोनई, नेवासा)
यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अझमत इकबाल यांच्या 'अधुरी तखलीक' व मेहरून्निसा खान यांनी लिहिलेल्या 'नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा गाईड' या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मोहम्मद बदर यांनी केले तर इमाम सय्यद यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज चौधरी, साजिद कुरेशी, राजे खान, हारुण अब्दुल्ला, एजाज शहा, मतीन मणियार, जुनेद शाह, अमरीन पठाण, महेवीश पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.