Type Here to Get Search Results !

एकतेच्या बळावर देशाची सुबत्ता आणि समृद्धी अवलंबून असते : सहा. पोलिस आयुक्त प्रताप पोमण

सोलापूर : छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमातून शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान गेली अनेक वर्षे सर्व समाज घटकांना एकत्र आणण्याचे काम अविरतपणे करीत आहेत. एकतेच्या बळावर देशाची सुबत्ता आणि समृद्धी अवलंबून असते, असं प्रतिपादन सहाय्यक पोलिस आयुक्त प्रताप पोमण यांनी केले.

मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, सिध्देश्वर मंदिर मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, शिख समुदायाचे ज्ञानी रमेश सिंग, फर्स्ट चर्चचे सुपर्णकुमार व्ही. घाटे, खादिमुल हुज्जाजचे सदर हाजी उस्मान शेख या धर्मगुरूंची प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार नरसिंग मेंगजी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त पोमण बोलत होते. 

सर्व मानवजात आपल्या उत्क्रांतीत आचार, विचार, आहार, प्रार्थना, दैवत व अन्य बाबी बदलत गेले. यातूनच धर्म, जात-पंथ निर्माण झाले. सर्व धर्मांचा आदर करत आपण आपल्या शहराची, देशाची एकात्मता वाढीस लावावी, यातूनच समृद्धता निर्माण होते. हे काम गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या माध्यमातून शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान करीत आहेत. आज अशा निरपेक्ष समाजसेवकांची गरज आहे. असे मत सहा. पोलिस आयुक्त पोमण यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, राजा सरवदे, सुधीर खरटमल, चंद्रकांत वानकर, पद्माकर काळे, अमोल शिंदे, जेल रोड पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत, सुशीलकुमार बंदपट्टे, प्रथमेश कोठे, केदार उंबरजे, अमर पुदाले, शिवानंद पाटील, ताहेर बेग मौलाना, माजी महापौर आरीफ शेख, रियाज हुंडेकरी, प्राचार्य महेबुब दलाल, हाजी मुनाफ चौधरी, अन्वर सैपन, सरफराज अहमद, बिज्जू प्रधाने, जुबेर कुरेशी, म. शफीक कॅप्टन, ॲड. गोविंद पाटील, गंगाधर कारीमुंगी, युवराज पवार, रविंद्र मोकाशी, अविनाश गोडसे, रईस बागवान, मुजिब खलिफा, रवी मोहिते, पोपट भोसले, योगेश कुंदूर, हेमंत ढवळशंक, प्रा. जैनोद्दीन मुल्ला, शाम कदम, यासिर बागवान, समीर शेख, सोमनाथ राऊत, प्रकाश ननावरे, असिफ पठाण, सौरभ भांड, शोएब चौधरी, सौ. श्रीदेवी फुलारी, सौ. निर्मला शेळवणे, सौ. मनिषा नलावडे आदी उपस्थित होते. 

ईद मिलनचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, राम गायकवाड, राजू हुंडेकरी, बशीर सय्यद, जावेद बद्दी, रिजवान दंडोती, तन्वीर गुलजार, कादर भागानगरी, कय्युम मोहोळकर, वाहिद तांबोळी,  हारिस शेख आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

आपण ही बातमी पाहू शकता !

उड्डाणपूलाच्या सुधारित प्रस्तावासाठी ९६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर

https://www.shivrajyapatra.co.in/2025/04/blog-post_48.html

..... ...................

....ईद-ए-मिलन कार्यक्रमात यांचा झाला सन्मान !

या कार्यक्रमात दुष्काळी भागातील प्रयोगशिल शेतकरी दादासाहेब खिल्लारे (बीड), अश्फाक मुजावर (अक्कलकोट), बाबासाहेब बिराजदार (केसर जवळगा), विजय पाटील (बार्शी), देवराज सावळगी (सोलापूर) यांचा माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते समायोचित सन्मान करण्यात आला.