बौध्द गया महाविहाराचे नियंत्रण-व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपतींना निवेदन

shivrajya patra

 

सोलापूर :  बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे तसेच केंद्र सरकार आणि बिहार सरकारने आपले विशेष अधिकार वापरून १९४९ चा कायदा दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात यावा, अशा मागण्यांचं निवेदन भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संयुक्तरित्या आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना पाठविण्यात आले.

सम्राट अशोक ह्यांनी इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात; मात्र या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.

महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी १९९२ पासून आंदोलन होत आहेत. तरीसुद्धा महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. त्यामुळे पाच हिंदू धर्मीय ह्यांचे प्राबल्य असल्याने बौध्द गया येथील महाविहार येथे पंडे आणि ब्राम्हणवादी पुजा आणि कर्मकांड करीत असतात. त्यामुळे ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले, तीचं कर्मकांड येथे सुरु आहेत.

जागतिक वारसा म्हणून मान्यता प्राप्त बौध्द गया येथील महाविहार व्यवस्थापन कायदा तातडीने बदलण्यात यावा, अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावतीनं संयुक्तरित्या करण्यात आलीय.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून भारतीय बौद्ध महासभा सोलापूर शाखेच्या व वंचित बहुजन आघाडीच्या संयुक्त विद्यमाने हा शांततापूर्ण मार्च निघाला होता. यामध्ये आयु. अण्णासाहेब वाघमारे, धम्मरक्षिता ताई कांबळे , समता सैनिकदलाचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे तसेच डॉ. सुरेश कोरे, राजरत्न फडतरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यापासून यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मार्चचा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर समारोप झाला. यावेळी भंते सारीपुत्र धम्माचारी, सौ. पुष्पा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार तसेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भिमराव आंबेडकर ह्यांचे पुढाकाराने तसेच समता सैनिक दल व विविध बौद्ध संघटना यांच्यावतीने बुधवारी, १२ मार्च रोजी देशभरातील बौद्धांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्यावती संयुक्तरित्या आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) हे पवित्र बौद्ध धर्मस्थळ असून, बोधगया महाविहार कायदा १९४९ चा अन्यायकारक कायदा रद्द करावा, बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे, जागतिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विशेष विकास निधी आणि सुविधा तात्काळ देण्यात याव्यात. आपला देश स्वातंत्र्य झाल्यावर २६ जानेवारी १९५० पासून घटना लागू झाली आहे. त्यावेळी भारतीय राज्यघटनेचे कलम १३ नुसार घटना लागू होण्यापूर्वी केलेले सर्व कायदे आणि नियम निरस्त केले आहेत, मात्र तरी देखील देशात १९४९ चा नियमबाह्य कायदा लावून बौध्द समूहाचे धार्मिक अधिकार काढून घेण्यात आले असल्याचेही वक्त्यांनी बोलताना सांगितले.

यावेळी जिल्हा सचिव अनिरुध्द वाघमारे, मिलिंद प्रक्षाळे, राजेंद्र जाधव, अंगद गायकवाड, जालिंदर चंदनशिवे, करण वाघमारे, सागर सोनवणे, नाना गायकवाड, दत्तात्रय सिध्दगणेश, प्रमोद गवळी, बुध्दा गायकवाड यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातून आलेले अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top