कुर्डूवाडी : सध्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे. त्यावर कोणाची मक्तेदारी नाही. आपली स्वतःची ओळख संपत्तीने नव्हे तर ज्ञानाने होते. संविधानाची कास धरीत नवभारताची निर्मिती करणारे व्हा, असं आवाहन महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.
राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या माढा तालुका शाखेच्या वतीने तुळजाभवानी अध्यापक महाविद्यालयात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात अध्यक्षस्थानावरून अण्णासाहेब भालशंकर बोलत होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांना ग्रंथ व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी कुर्डवाडी नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल, केंद्रप्रमुख लक्ष्मण कारंडे, श्री तुळजाभवानी अध्यापक विद्यालयाचे सचिव डॉ. रवी सुरवसे, महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे राज्यसरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हाध्यक्ष प्रा. युवराज भोसले, जिल्हासचिव रवी देवकर, माढा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जानराव, नानासाहेब भालशंकर, दाऊत आतार, विठ्ठल एकमल्ली, शरद सावंत, धनाजी धिमधिमे, मल्लिकार्जुन कांबळे, बलभीम हांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रशासनाधिकारी शाहू सतपाल म्हणाले की, सध्या शिक्षणाचे खाजगीकरण होत चालले आहे. उच्च शिक्षण महाग होत आहे, स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत टिकावयाचे असल्यास तंत्र स्नेही विद्यार्थी होऊन स्वतःच्या पायावर उभे रहा, असे विचार मांडले. यानंतर केंद्रप्रमुख लक्ष्मण कारंडे, डॉ. रवी सुरवसे, महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, रवी देवकर, देशमुख सर यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन व यादी वाचन प्रतिभा पांडव यांनी केले तर प्रफुल जानराव यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश कांबळे, माधव माने, भारत कापरे, प्रा. विनोद, अंकुश जाधव, सुशीलचंद्र भालशंकर, जयश्री बेडकुते, गीतांजली शिंदे, संजय गायकवाड, शिवाजी खारे, धनंजय हेंबाडे, नीलकंठ सोनवणे, बाजीराव पाखरे, किसन कांबळे आदींनी परिश्रम घेतले.