सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अष्टोप्रहर कष्ट घेऊन जी घटना तयार केली, त्यामागचं उद्देश देशात एकोपा, बंधूभाव, शांतता आणि समृद्धी अपेक्षित होती. हे सर्व भारतीयांचं ही टिकवणे कर्तव्य आहे, असं मत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, पोपट भोसले, ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, जावेद बद्दी, बशीर सय्यद, करण भोसले, लक्ष्मण गायकवाड, आकाश भोसले, बाबा भोसले, गफार खान, सिराज शेख, रऊफ मैंदर्गी आदी उपस्थित होते.