Type Here to Get Search Results !

मानधनासह अन्य मागण्यांसाठी लोककलावंत शासनाच्या द्वारी


सोलापूर: जिल्ह्यातील लोककलावंताच्या विविध मागण्यांची शासन दरबारी दखल घेण्याच्या आग्रहासाठी लोककलावंताच्या विविध संघटनांच्या वतीने गुरुवारी, ०८ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. या लोककलावंतांनी त्यांच्या लोककलांचेही शासनाच्या दारी सादरीकरण केले.

शाहीर विश्वासराव फाटे लोककला संस्था व सोलापूर जिल्हा लोककलावंत संघटनेच्या वतीने गुरुवारी, ०८ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या एक दिवशीय धरणे आंदोलनाच्या निमित्ताने अनेक लोककलावंत पुराणातील अनेक व्यक्ती रेखांच्या रूपात आले होते, जणू प्रभू रामचंद्रजी आणि भक्त हनुमान पाहिले तर पाहणारेही रामायण काळापर्यंत पोहोचले असावे. 


अशा वेशभूषेत आलेल्या लोककलावंतांच्या, वृध्द कलाकार मानधन समिती गठीत करणे, कलावंतांच्या मानधनात वाढ होऊन किमान दरमहा ५ हजार रूपये मानधन मिळावे, केंद्र शासनाप्रमाणे कलावंतांना समान मानधन मिळावे. नाट्य परिषद व तमाशा परिषद याप्रमाणे लोकलावंताची परिषद प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्ह्यात घ्यावी आणि सन २०२० पासून प्रलंबित असलेली लोककलावंत मानधनाची प्रकरणे तात्काळ मंजूर करण्यात यावी, अशा सर्व लोक कलावंतांच्या मागण्या आहेत. या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी १०.०० ते ५.०० वा. पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य प्रवेशव्दारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

या मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन शासन दरबारी दखल घ्यावी, म्हणून जिल्ह्यातील वाघ्या-मुरळी, जात्यावरच्या ओव्या, कुडबुड्या जोशी, भेदिक शाहीरी, लोकशाहीर, कला पथक, भारुडकार, किर्तनकार, वासुदेव, संगित भजन, बहुरुपी, तमाशा, नाट्यकलाकार, (मराठी व कन्नड, तेलगु) गायक वादक, सनई वादक, सुंदरी वादक, बासरी वादक, सिंगवादक इत्यादी कलावंत बहुसंख्यने धरणे आंदोलनमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी आपआपल्या कलांचं दिवसभर सादरीकरण केलं.



यासाठी सल्लागार डॉ. प्रा. महादेव देशमुख, प्रा. शाहीर अजिज नदाफ, सुरेश बेगमपुरे, चंद्रकांत फाटे, राजु वाघमारे, यल्लपा तेली, गोविंदअप्पा सितारे, शिवाजी गंगवणे, नागनाथ परळकर, राम कृष्ण सावंत, महिबुब मुजावर, बाळासाहेब सुतार, हसम शेख, मल्लम्मा तेली, नागम्मा येडवली, सुभद्रा सुर्यवंशी, गिताबाई सुर्यवंशी व उत्तम गंगावणे, गोविंद माने, बजरंग घुले यापैकी अनेक लोककलावंतांनी कार्यक्रमाचं सादरीकरण केलं.