Type Here to Get Search Results !

पेनूर येथे भक्तीमय वातावरणात पार पडले माघवारीतील तिसरे गोल रिंगण


सोलापूर/शिवानंद जाधव 

 " जाता पंढरीसी सुख वाटे जीवा " 

 या उक्तीप्रमाणे हजारो वारकरी भाविक  "ज्ञानोबा तुकाराम " नामाच्या गजरात उत्साहात चालत जातात. या सोहळ्यातील तिसरे भव्य गोल रिंगण मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात रविवारी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. करण्यात आले. माघवारी पालखी सोहळा परंपरेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो. हा रिंगण सोहळा सुरु करून ऐतिहासिक परंपरा सुरु झाली आहे.



माघवारी निमित्त मोहोळ मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचे रिंगण सोहळासाठी एकत्रीकरण करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर यांच्या पुजनाने या कार्यक्रमास प्रारंभ झाला.



अखिल भाविक वारकरी मंडळ व जोतीराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन बापू कापसे (प्रदेश उपाध्यक्ष), संजय पवार (शहर अध्यक्ष),  इ. यांच्या कडून पेनूर ग्रामस्थांतर्फे सरपंच सुजित आवारे, उप सरपंच सागर चावरे यांचे कडून सन्मान करण्यात आला. 



तसेच दर्शन ढगे, राकेश अन्नम, पांडुरंग शिंदे, बप्पा कापसे, अच्युत मोफरे, इ. या मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात येणार असून सरपंच सुजित आवारे, ह.भ.प. भागवत चवरे महाराज राष्ट्रिय उपाध्यक्ष, ह. भ. प. दयानंद भोसेकर महाराज, सागर चावरे (उप सरपंच) इ. पदाधिकारी यांचे हस्ते रिंगणातील मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले होते. सर्व दिंडी प्रमुख विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरु करण्यात आले.



पेनूर पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत अश्व धावताना सात्विक ऊर्जा दिसत होती. अतिशय आनंदी वातावरण असल्याने विद्यार्थी रिंगण पूर्ण करताना उत्साह खूपच चांगला दिसून आला. या सोहळ्यासाठी बळीराम नाना चवरे, महेश चवरे, निवृत्ती मोरे, सचिन गायकवाड (शहर उपाध्यक्ष), गणेश वारे, रामदास सुरवसे, यांनी परिश्रम घेतले.  ह. भ. प. सुधाकर महाराज इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.