Type Here to Get Search Results !

मनात आणलं तर दिव्यांग व्यक्ती चांगला उद्योजक बनू शकतो : जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजशेखर शिंदे


मनात आणलं तर दिव्यांग व्यक्ती चांगला उद्योजक 

बनू शकतो : जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजशेखर शिंदे

सोलापूर : आनंदी वातावरणात सकारात्मक विचार केल्यास हटके काम करण्याची जिद्द असल्यास सकारात्मक विचार करणाऱ्या माणसाच्या सानिध्यात असल्यास दिव्यांगत्वावर मात करून एक यशस्वी उद्योजक बनू शकतो, असे मत जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक राजशेखर शिंदे व्यक्त केले.

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने दिव्यांग संसदेचे आयोजन शिवछत्रपती रंगभवन येथे करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे,  जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर, यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. 

दिव्यांग संसदेचे उद्घाटन जिल्हा उद्योग केंद्र चे व्यवस्थापक राजशेखर शिंदे व जिल्हा विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्य अॅड. लक्ष्मण मारडकर जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर इतर मान्यवरांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले.


कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिव्यांग संसदेबाबतची संकल्पना विषद केली. अॅड. लक्ष्मण मारडकर यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाबाबत मार्गदर्शन व दिव्यांगासाठी असणाऱ्या विविध मोफत विधी सेवा बाबत मार्गदर्शन केले. त्यामध्ये तालुकास्तरावर जिल्हासतरावर राज्यस्तरावर तसेच केंद्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या विधी सेवा प्राधिकरणाबाबत मार्गदर्शन केले. 

प्रीती पारकट्टी यांनी दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तृष्णा गायकवाड यांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता  याबाबत मार्गदर्शन केले. शिवलीला स्वामी यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबतच्या विविध कर्ज योजना याबाबत मार्गदर्शन केले. तुषार घड्याळे जगदंबा गारमेंट यांनी अनेक दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, तसेच अनेक दिव्यांगाना आवाहनही केले आहे, ज्या बेरोजगारांना रोजगाराची आवश्यकता आहे, अशा दिव्यांगांनी संपर्क साधावा. जेणेकरून त्या दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल. त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करता येईल. 


सुरज किरण संस्थेचे मनिष उपाध्ये यांनी दिव्यांगांच्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या, याबाबत आवहन केले. तसेच कमीत कमी  दोन महिन्यातून एकदा तरी दिव्यांगांची समन्वयक बैठक लावून त्यामध्ये दिव्यांगांच्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्याचे आवाहन केले. या संसदेमध्ये अनेक दिव्यांगांनी आपल्याला असणाऱ्या अडचणीबाबत प्रश्न विचारले व त्याचे समाधानकारक उत्तर देऊन संबंधित अधिकाऱ्यांनी त्या प्रश्नाचे निरसन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सच्चिदानंद बांगर वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता समाज कल्याण विभाग जि.प.सोलापूर यांनी केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कमलाकर तिकटे, रामचंद्र कुलकर्णी, बसवराज जेऊरे, साहेबगौडा पाटील, भीमाशंकर लोखंडे, प्रशांत पवार, चनवीर स्वामी, नरेंद्र वाघमारे, बाळू बिराजदार यांनी परिश्रम घेतले.