Type Here to Get Search Results !

आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनी जिल्हा-तालुका स्तरावर मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन



आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिनी जिल्हा-तालुका स्तरावर 

मौलाना आझाद विचार मंचच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन


सोलापूर : 'आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक दिन' निमित्त मुस्लिम समाजाच्या  शिक्षण, आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने, सोमवारी, १८ डिसेंबर रोजी शांततामय मार्गाने राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यावेळी मुस्लिम समाजाच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, तहसील स्तरावर तहसिलदार यांच्यामार्फत शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी अल्पसंख्याक मोठ्या संख्येने उपस्थित राहून राज्यव्यापी आंदोलन यशस्वी करावं असं आवाहन हसीब नदाफ यांनी केले आहे.

 १९ जुलै २०१४ च्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला ०५ टक्के आरक्षण, केंद्र व राज्याच्या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करा, प्रधानमंत्री १५ कलमी कार्यक्रमाची कृतीशील अंमलबजावणी होणे, मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंत १०० टक्के  शिष्यवृत्तीची सोय, जिल्हा निहाय मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृहांची सोय, मोबलींचींग ज्या ठिकाणी होतील, तिथे शीघ्र गतीने जोशीवर कारवाई करा आणि पिढीताना नुकसान भरपाई द्या, राजकीय क्षेत्रामध्ये मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व द्या, सर्व जाती जमाती जातनिहाय जनगणना करा, तसेच त्यामध्ये मुस्लिम  O B C -V I N T प्रवर्गातील जातीची जनगणना करा, अशा प्रमुख मागण्या आहेत.

उर्वरित मागण्यांमध्ये राज्यातील वक्फ संपत्तीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी करा तसेच समाजातील विधवा आणि तलाक पीडित महिलांच्या उन्नतीसाठी करावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार झुंड हत्याविरोधी विशेष व शिघ्र कृती पथकाची स्थापना करा, पार्टी व महाज्योतीच्या धरतीवर मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरची स्थापना करा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीमध्ये मुस्लिम समाजाचा समावेश व्हावा, अशा सर्व मागण्या असून शासन दरबारी मुस्लिम समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा संयोजकांनी व्यक्त केलीय. 

उपरोक्त मागण्यांसाठी मौलाना आजाद विचार मंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करणार असल्याचे  माहिती मौलाना आझाद विचार मंच  चे  प्रदेश  उपाध्यक्ष हसीब  नदाफ, सोलापूर जिल्हा अध्यक्ष- इस्माईल पटेल यांनी सांगितले. या धरणे आंदोलनात समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावं , असं आवाहन उभयतांनी केले आहे.