Type Here to Get Search Results !

कल्याण क्रांतीत सिध्दरामेश्वरांचे मोठे योगदान : शरण बसव स्वामी



सोलापूर/मुलाणी रमजान : १२ व्या शतकात झालेल्या कल्याण क्रांतीत सिद्धरामेश्वरांचे मोठे योगदान असून अनुभव मंटपचे ते तिसरे अध्यक्षही होते. शिवयोगी सिद्धराम यांच्यामुळे सोन्नलगी म्हणजे सोलापूर पुण्यभूमी बनली आहे. महात्मा बसवण्णा, अल्लमप्रभूदेव, चन्नबसवेश्वर यांच्या पुरोगामी विचार मांडले. त्याचप्रमाणे सिद्धरामेश्वरांनी ६८ हजार वचनांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले आहे. स्त्री पुरुष समानता, वर्णभेद,सामाजिक ऐक्य,कायक वे कैलास  या विचारांची पेरणी बाराव्या शतकात केले, असे प्रतिपादन शरण बसव स्वामीजी यांनी केले.

शेळगी परिसर मित्र नगरातील वैष्णवी हॉल येथे सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी लिंगायत महासभा, सोलापूर च्या वतीने श्रावणमासानिमित्त श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर जीवन चरित्रावर परमपूज्य शरण बसवस्वामीजी (चरंतेश्वर मठ) बेळगावी जिल्हा, हुक्केरी तालुक्यातील बेळगी, यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रंगसिद्ध कोरे होते.      

या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे, ज्येष्ठ साहित्यिक चन्नवीर भद्रेश्वर मठ, ब्रह्मदेव माने बँकेचे संचालक शावरप्पा वाघमारे, ज्येष्ठ साहित्यिक सिंधुताई काडादी, बसव सेंटरचे प्रमुख शिवशंकर काडादी,  शंकरलिंग मंडळाचे अध्यक्ष राजश्री थळंगे, जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, मल्लिकार्जुन मुलगे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.                                                    
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय काडादी, शिवराज कोटगी, धोंडप्पा तोरणगी, बसवराज चाकाई, अशोक शेगावकर, शिवराय तेली, नागेंद्र कोगनूरे, विजय भावे, राहुल निलाखे, विश्वजीत हेले, राजेंद्र हौदे, लक्ष्मण चलगेरी, राजेंद्र खसगी, नागेश पडनुरे, गणेश धोकटे यांनी परिश्रम घेतले.