मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांना बांधली राखी
ओवाळणी म्हणून द्या सिटीस्कॅन मशीन
सोलापूर : सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील दहा वर्षांपूर्वीची जुनी सीटी स्कॅन मशिन बंद पडली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होत आहे . सीटी स्कॅन मशिनसाठी जिल्हा नियोजन समिती, राज्य व केंद्र सरकारकडे निधीची मागणी करून सुद्धा अद्याप हि निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे शासन चे लक्ष वेधण्यासाठी हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय बी ब्लॉक येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
.एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला, अद्यापही सिटी स्कॅन मशिन बंदच आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून दररोज शेकडो रुग्ण उपचारांसाठी येतात. बहुतांश रुग्णांची सिटी स्कॅन करण्याची आवश्यकता असते. बाहेर खासगी रुग्णालयांत हजारो रुपये सिटी स्कॅनसाठी मोजावे लागतात. मात्र, तेच जिल्हा रुग्णालयात मोफत वा माफक दरात होत असल्याने शेकडो रुग्णांसाठी मोठा दिलासा होता. परंतु रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिन बंद असल्याने रुग्णांना व्हेंटिलेटर ची सुविधा असलेल्या ॲम्बुलन्समधून सिटीस्कॅन करण्यासाठी इतर रुग्णालयात जावे लागते. त्यासाठी गोरगरीब रुग्णांना परिस्थिती नसतानाही ॲम्बुलन्स खर्च व सिटीस्कॅनचा खर्च कर्जाऊ पैसे काढून करावे लागत आहे
अनेक गंभीर रुग्ण सिटी स्कॅन चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे अनेक सर्वसामान्य रुग्णांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तर, सिटी स्कॅन बंद असल्याने अनेक रुग्णांवरचे उपचारही खोळंबले आहेत. शासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार करण्याची घोषणा करण्यात आली, पण ती फक्त कागदावरच राहिलेली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही हॉस्पिटलमध्ये या योजनेचा लाभ दिला जात नाही. गोरगरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ केली जाते, त्यामुळे सदर योजनेची घोषणा न करता संबंधित रुग्णालयाला सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार करणे बंधनकारक करावे, त्यासाठी स्वतंत्र कायदे करावेत, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सिताराम बाबर, ओंकार कदम, नागनाथ कोरे, शेखर कंटीकर, भीमा घोडके, अमोल सलगर, ज्ञानेश्वर पवार, लखन गायकवाड, शेखर चौगुले, अण्णा सावंत, जिल्हा सचिव राजेंद्र माने, अनिल गवंडी, किरण कदम, दूर्वा मोठे, अमृता मोठे, स्वरूपा मेरु, ऋतुजा पराडकर, शुभांगी लचके, आर्या लचके आणि श्रेया लचके आदी उपस्थित होते.