पत्रकारांवरील भ्याड हल्ला; पत्रकार कृती समितीने नोंदविला निषेध

shivrajya patra

सोलापूर : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या पत्रकार बांधवांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने पत्रकार वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिलेला नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, सरकारकडून पत्रकारांच्या सन्मानाची पायमल्ली सातत्याने होत असल्याचा आरोपही पत्रकार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

दरम्यान, सोलापूर येथील चार हुतात्मा पुतळा येथे पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्था व पत्रकार बांधवांच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील निंदनीय घटनेचा काळ्या फिती लावून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला.

या घटनेचा जाहीर निषेध करताना पत्रकार कृती समिती बहुउद्देशीय संस्थेचे अप्पाश्री लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते नाना प्रक्षाळे व ज्येष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "पत्रकारांवरील हल्ले हे लोकशाहीला धोका आहे, अशा घटना निंदनीय असून सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी," अशी मागणी त्यांनी केली.

निषेध सभेला सैफन शेख, लतीफ नदाफ, नितीन करजोळे, गिरमला गुरव, अस्लम नदाफ, राम हुंडारे, सिद्धार्थ भडकुंबे, अकबर शेख, विजयकुमार उघडे, सुरज राजपूत, नितीन कांबळे, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, बापूताज पाटील, महेश जाधव, सिद्धू पुजारी, ईसुब पिरजादे, केदार सुरवसे, नंदू कांबळे, रमेश अपराध, कीर्तीपाल गायकवाड, विलास सरवदे, अजेय नागमोडे आदी मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.

To Top