जननायक अभय रंगारी " जीवनगौरव " पुरस्काराने सन्मानित

shivrajya patra

अभय च्या खडतर परंतु परिवर्तनवादी जीवनप्रवासावर प्रेरणादायी चित्रपटाची निर्मिती होणार 

भंडारा : मानवतावादी विचारांना आदर्श मानून संपूर्ण मानवी जिवाबरोबर निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या सर्व जीवाचे रक्षण, जतन, संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो, हा पुरस्कार सामाजिक , शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय  व कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून, कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव अभय डी रंगारी यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे.

अभय हे कवी, लेखक, मुक्त पत्रकार, समाजसेवक, प्रभावी वक्ता , समीक्षक, साहित्यिक साहित्यकार, जननायक लोकगौरव, शेतकरी कामगार नेते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते, कुशल संघटक तसेच मानवाधिकाराचे खंदे समर्थक असून, मानवाधिकाराचे रक्षण, जतन, आणि संवर्धनासाठी आपले आयुष्य खर्ची करत आहेत.

मौलिक अधिकार देशाचे संविधान देतात, मात्र मानवाधिकार हे मनुष्य या नात्याने सर्व माणसांना जन्मताच प्राप्त होतात. मानव अधिकाराचा तात्पर्य मानवासाठी आवश्यक अधिकार असतो, अर्थात मानव अधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, वांशिक, भाषा, धर्म, किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता सर्व मानवासाठी जीवन जगण्यासाठी जन्मजात हक्क आहेत. त्यात जीवन आणि स्वातंत्र्याचा, गुलामगिरी आणि छळापासून स्वातंत्र्य, मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही समाविष्ट आहेत. यापैकी कोणत्याही अधिकारावर शासन प्रशासन किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था ने या अधिकाराचे हनन केले, त्या-त्या वेळी अभय डी रंगारी यांनी याला सर्व ताकदीनिशी विरोध करून मानवाधिकाराचे रक्षण जतन संवर्धन केले आहे. त्यांच्या या अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जनसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून अभय हे  परिसरात सुपरिचित आहेत.  जनहितार्थ लोकांच्या कोणत्याही समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवितात, त्यांना या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार संभाजी नगर (औरंगाबाद ) निवड झाली. कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई आणि मालवा ट्रस्ट, मुंबई यांच्यातर्फे गोल्डन पिकाक अवार्ड, मानवाधिकार भूषण पुरस्कार, मानवाधिकार फाउंडेशन अहिल्यानगर (अहमदनगर), महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार, मानवतावादी सांस्कृतिक चळवळ, दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असून अनेक वर्तमानपत्रातून अविरत लेखन चालू आहे. सोशल मीडिया चा सुध्दा प्रभावीपणे वापर करून व्यवस्था परिवर्तन आणि व्यवस्था निर्माणाचे कार्य अहोरात्र चालू आहे, याबद्दल अभय डी रंगारी यांना जीवनगौरव पुरस्कार दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर (छत्रपती संभाजी नगर), डॉ. खुशाल बोपचे (माजी खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ), संजीव भांबोरे (प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस) यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने, सन्मान सामाजिक उपक्रम,गौरव सोहळा, शांतीवन, चिचाळ, पवनी, भंडारा येथे सन्मानित करण्यात आले. याबद्दल परिसरातील जनतेने त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या पुरस्कारासाठी देशातील अनेक लोकांच्या कार्याची पाहणी करून मान्यवरांची निवड केली आहे. अभय यांचे कार्य हे फार धाडसाचे आणि परिवर्तनवादी आहेत. त्यांच्या स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा, समस्या आणि समाधान कार्ड ची दखल साऊथ फिल्म इंडस्ट्रीने घेऊन ""गेम चेंजर"" फिल्म मध्ये स्टॅम्प पेपर वर जाहीरनाम्याचा दाखविलेला सिन , दुसऱ्या पार्टी ने आणि लोकांनी सुद्धा आदर्श घेऊन आग्रह करावा असाच आहे.

पूर्वी सिनेमात जे दिसत होते, ते पाहूनच लोक तसे बनण्यासाठी किंवा करण्यासाठी धावपळ करीत असत, मात्र अभय ने याला छेद देऊन नविन ऐतिहासिक पार्श्वभूमी निर्माण केली आहे. अभय ने केले आणि चित्रपटाने दाखविले, याचाच एक पैलू म्हणून येणाऱ्या काळात अभय डी रंगारी च्या जीवनावर अभय ने आजपर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेऊन, यात रस्ता रोको आंदोलन, जेलभरो आंदोलन, जबरदस्तीच्या वॅक्षिण विरोध, भारत बंद आंदोलन, शेतकरी परिवर्तन यात्रा, स्मार्ट मीटर (रिचार्ज मीटर विरोध), शिक्षणाचा काळा बाजार,  अपार आय डी विरोध, किसान आय डी विरोध, आधार कार्ड च्या संभाव्य धोक्याविषयी जनजागृती, अंधश्रद्धा निर्मुलन,  शिक्षणासाठी धडपड, जनावरांना चराई साठी जगलं खुले करणे,  सैनिकांसाठी आवाज उठविणे, स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा घोषित करून राजकारणाची दिशा आणि दशा बदलून आदर्श निर्माण करणे, सामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म शिक्षणासाठी धावपळ करतांनाच व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्न उराशी बाळगून ,अनेक अडथळे दूर करून जीवनगौरव पुरस्कारापर्यंतच्या प्रवासावर चित्रपट निर्मिती केली जाईल , जेणेकरुन येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळेल, असाच आहे.

To Top