कासेगांवच्या 'त्या' दुर्घटनेची पूराच्या साक्षीने वर्षपूर्ती

shivrajya patra

सोलापूर : गुरुवारी, १२ जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क पहाटेपासून खंडीत झाला आहे. कासेगांव-उळेगांव रस्त्यावरील कासेगांव पूलावरून ज्ञानेश्वर कदम नावाचा तरुण वाहून गेल्यानं मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेची आजच्या  तारखेला पूर आलेल्या पाण्याच्या साक्षीनं वर्षपूर्ती झालीय.

या पूलावर आलेल्या पूराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तिघांपैकी  ज्ञानेश्वरचं शव तीन दिवसांनंतर हाती लागले होते. तो पाण्यात वाहून गेल्यावर खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कदम कुटुंबियांचं सांत्वन करुन सर्वोतोपरी मदतीचं आश्वासन दिलं होते. त्याचवेळी खड्ड्यात गेलेल्या पूलाच्या जागी नव्यानं पूल बांधून ग्रामस्थांची समस्या दूर करण्याचंही आश्वासन दिलं होतं, मात्र ते या वर्षपूर्तीपर्यंत सत्त्यात उतरल्याचं दिसत नाही.

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाकडं नेहमीच दुर्लक्ष होतं, ते उन्नतीच्या मार्गापासून कोसो दूर राहतो, अशी जनभावना असते. जिल्हा प्रशासनानंही या वर्षभरात सकारात्मक पाऊल उचलल्याचं दिसत नाही. लोकप्रतिनिधींकडून ४२ कोटी रुपयांचा खेचून आणून कासेगांवसाठी खर्ची टाकल्याचे डिजीटल गावात लागले होते, तरी सुध्दा पूलावरून जाणाऱ्या पाण्याच्या पूराचा अन् कासेगांव नियमितपणे जनसंपर्क तुटण्याचा 'सिलसिला' जारी असल्याचं चित्र वास्तवात कासेगांवकरांच्या नशिबी आहे. दुपारनंतर पाणी ओसरल्यावर रहदारी सुरू झालीय, तत्पूर्वी अनेकांनी जीव धोक्यात घालून पाण्यातून पूल ओलांडल्याचं दिसून आलंय.


***

To Top