धाराशिव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी च्या शाळेस गुरुवारी,०१ मे महाराष्ट्र दिनी उत्कृष्ट शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी या शाळेने विविध सहशालेय उपक्रम घेऊन सतत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सकारात्मक प्रयत्न केले आहेत, विद्यार्थांच्या अंगी सर्व मूल्ये रुजावीत व राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविले, तसेच 225 विद्यार्थ्यांना विविध नऊ प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना बसवून अनेक विद्यार्थी जिल्हा पातळी, विभागीय पातळी व राज्य पातळीवर गुणवत्तेत यशस्वी झाले आहेत.
याची दाखल जिल्हा प्रशासनाने घेऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत व मा. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, मा. आमदार कैलास दादा पाटील, मा. आमदार प्रवीणजी स्वामी, मा. शिक्षण अधिकारी (प्रा.) अशोक पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुधा साळूंखे यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळणी या शाळेस उत्कृष्ठ शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती संजीवनी पौळ, उपाध्यक्षा श्रीमती अफसाना शेख, सदस्य श्रीमती अनिता पौळ, मुख्याध्यापक बशीर तांबोळी, शिक्षिका वर्षा डोंगरे, सुनीता कराड, सत्यशीला म्हेत्रे, क्रांती मते, सुलक्षणा ढगे, श्रीमती नरवटे,राधा वीर आणि दिनेश पेठे यांनी हा सन्मानाचा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी लांडगे, श्रीमती माईंदरगी, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.