सोलापूर : जिल्ह्यात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. उपविभागातील नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 यांना दर सोमवारी व गुरुवारी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या कामानिमित्त भेटता येईल.
संबंधित वेळेत तक्रारदार नागरिक, अभ्यागत आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या वेळेत उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 कार्यालय येथे भेट द्यावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र.1 यांनी केले आहे.