Type Here to Get Search Results !

जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसंबंधी दिलेला शब्द पाळला : आमदार खरे

मोहोळ/प्रतिनिधी : गेल्या २ वर्षांपूर्वी उजनीच्या डावा कालवा फुटून मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आठ दिवसात पैसे मिळतील, अशी ग्वाही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. त्यामुळे आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याने 330 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागला आहे. सोलापूरचे अधीक्षक अभियंता याचे खात्यात जवळपास 32 लाख 77 हजार 240  रुपये जमा झाले असल्याचे आमदार खरे यांनी सांगितले.

उजनी धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर २०२३ सालाच्या प्रारंभी २९ जानेवारी रोजी पहाटे मोहोळ तालुक्यातील पाटकूल आणि पंढरपूर तालुक्यातील विटे आणि फुलचिंचोली येथील साखळी क्रमांक ११२/ ६५० या ठिकाणी उजनी डावा कालवा अचानक फुटला. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या, काहींच्या विहिरी- बोअरवेल गाळाने भरल्या, ठिबक सिंचन, इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या तर एका शेतकऱ्याचं घर ढासळले होते.

जानेवारी २०२३ मध्ये उजनी डावा कालवा फुटल्याने मोहोळ तालुक्यातील पाटकुल परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पैसे त्वरित द्यावेत, अशी आग्रही मागणी आ. राजू खरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत केली होती. जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असल्याचेही आमदार राजू खरे यांनी यावेळी म्हटले.