सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा येथील मूळचे रहिवाशी तथा हल्ली शेळगी येथील जयलक्ष्मी सोसायटीतील रहिवाशी रामहरी बलभीम जाधव यांचं रविवार मध्यरात्रीच्या सुमारास अल्पशः आजारानं निधन झाले. सोमवारी, ३० सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघून रूपाभवानी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठा सेवा संघ, सोलापूरचे माजी जिल्हा सचिव प्रा. संजय जाधव यांचे ते वडील होत.