' चतुर्थ श्रेणी ' च्या मागणीसाठी कोतवालांचे एकदिवसीय धरणे आंदोलन
सोलापूर : राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी चा दर्जा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आक्रमक भूमिका घेतली असून मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी राज्यभरात जिल्हास्तरीय धरणे आंदोलन केले असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना लेखी निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास 25 तारखेपासून राज्यभर काम बंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव यांनी दिली.
गुरुवारी 26 सप्टेंबरपासून आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येत असून मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. महसूल प्रशासनातील कोतवाल महत्त्वाचे घटक आहे. महसूल गोळा करणे निवडणूक प्रक्रियेत व स्थानिक पातळीवरील नित्य नियमाची कामे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
अशा विविध जबाबदाऱ्या पार पडत असून कोतवालांना अद्यापपर्यंत चतुर्थ श्रेणी चा दर्जा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आणि सुविधा मिळत नाही. कोतवाल संघटनेच्या माहितीनुसार या मागण्यावर कोणतीही प्रभावी कारवाई झाली नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील हजारो कोतवाल आंदोलनात सहभागी होणार असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू असणार आहे.
कोतवाल महसूल विभागातील शेवटचा भाग आहे. तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करणे, महसूल गोळा करणे, गौणखनीज आळा बसविणे, निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, पीक पाणी, दुष्काळात नुकसान भरपाई, पंचनामाचे सर्वेक्षण, करणे स्थानिक पातळीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, यासाठी पोलीस पाटील व पोलीस प्रशासनास मदत करणे, वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांना सहाय्य करणे अशा अनेक कामकाजात कोतवाल हा अत्यंत महत्त्वाचा घटक समजला जातो. मात्र, हा कोतवाल साठ वर्षापासून चतुर्थ श्रेणीसाठी सतत झगडत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री यांनी तातडीने बैठक घेऊन कोतवालांचा विषय निघाली काढावा, अन्यथा होणाऱ्या नुकसान राज्य शासन स्वतः जबाबदार राहणार आहे. त्यामुळे तातडीने बैठक घेऊन गेल्या पन्नास वर्षांपासून च्या मागणीचा निर्णय व्हावा, अशी मागणी सध्या जोरदार आहे.
या आंदोलन यशस्वी होण्यासाठी विठ्ठल गुरव,अनिल जाधव, मलिनाथ बाळगी राहुल तोडकरी, प्रविणकुमार बाबर, भगवान पारशी, गोरख ढोबळे, प्रलहाद खरे, अवधुत पुजारी, गुरुदास आरणे भागवंत चंदनशिवे, जाकीर कागदे, प्रवीण गुजले , नवनाथ इंगोले, बंदेनवाज दफेदार, संजय कुरवडे, उमेश क्षिरसागर, अर्जुन सनके, शहाजी हुलगे राजु साठे,
जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी धानय्या हिरेमठ, गौतम ठोकळे, इरण्णा कांबळे, बालाजी व्हळे, देवा सावंत, अनिल भोसले, समाधान सुरयंगध, दत्ता कदम, शिवानंद कोळी, श्रीशैल हक्के, रशीद शेख, सुदर्शन गुरव, सय्यद, सुरेश रामपुरे, रेवणसिधद सुतार, सुनील मुलगे, स्वामीनाथ आलुरे, शिवशरण कोळी, जगदीश देसाई, मलप्पा कोळी, हमीद शेख, पिंटु चव्हाण, पांडुरंग वाघमारे, कृष्णा इंगळे, कृष्णा लोखंडे महादेव खिलारे, हनुमंत पिसे, मल्हारी देवकाते, विश्वास बनकर, याकूब शेख, सुनील ठोंबरे, नवनाथ गेजगे,
महिला कोतवाल कर्मचारी सुलोचना देशमुख, गुरुदेवी चौधरी, रेणुका कुंभार, सुचिता काळे, ममता कोळी, अबुबाई चव्हाण, वनिता कुंभार, लक्ष्मी लाड, कविता चव्हाण, दिपाली स्वामी, अश्विनी गायकवाड, सरोजिनी कोळी, ऐश्वर्या कांबळे, रेशमा वाघमारे, सुलोचना आदलिंगे, मनिषा शिंदे यासह इतर महिला कोतवाल कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी आहेत.
मंगळवारी एक दिवसीय आंदोलन सोलापूर येथे जिल्हा परिषद पुनम गेट येथे करण्यात आले. यात संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील कोतवाल कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी महसूल कर्मचारी संघटना, तलाठी संघटना, चतुर्थी श्रेणी संघटना मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद संघटना कृती समिती सोलापूर विविध संघटना जाहीर पाठिंबा दिला.
यावेळी शंतनु गायकवाड (प्रदेश उपाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना), अशोक इंदापुरे (मध्यवर्ती महाराष्ट्र राज्य संघटना), गजानन गायकवाड (कार्याध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना), महेश बनसोडे इतर पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला. जिल्हाध्यक्ष (सोलापूर) विठ्ठल गुरव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी, एक दिवसाचे आंदोलन करण्यात आले.