Type Here to Get Search Results !

दिलीपराव माने शिक्षण संकुलातील दहावी-बारावी विद्यार्थ्यांना भावी वाटचालीच्या ' शिदोरी ' सह निरोप


सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला. या सर्व विद्यार्थ्यांना अजय पोण्णम यांनी,'दहावी बारावीनंतर पुढे काय व विद्यार्थ्यांपुढील आव्हाने' या विषयी मार्गदर्शन करताना, सर्व विद्यार्थ्यांना भावी वाटचालीची शिदोरी दिली. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे अजय पोण्णम (अध्यक्ष, अरिहंत इंग्लिश मीडियम, सोलापूर) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका माजी सभापती रजनी भडकुंबे होत्या. संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, विनोद उपलंची (मुख्याध्यापक, राजेश कोठे इंग्लिश मीडियम) संस्थेचे संचालक पाटलोजी जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.


 प्रमुख पाहुणे अजय पोण्णम यांनी 'दहावी बारावीनंतर पुढे काय व विद्यार्थ्यांपुढील आव्हाने' याविषयी मार्गदर्शन करताना, या विद्यार्थ्यांना भावी वाटचालीची शिदोरी दिली. प्रमुख पाहुणे अजय पोण्णम यांच्या हस्ते राज्यस्तरीय भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा इंटरमिजिएट व एलिमेंटरी चित्रकला परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा  प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला पाण्याच्या दोन टाक्या भेट म्हणून दिल्या. 

कार्यक्रमाचं प्रास्ताविक शुभांगी पेठकर यांनी तर सूत्रसंचालन राशी सीताफळे यांनी केलं. शिक्षकांमधून उमेश जगताप, जरीना सय्यद विद्यार्थ्यांमधून वैभवी भोसले, आलिया पटेल, वैष्णवी भालेकर, प्रिया गायकवाड, आशिया पटेल, अर्पिता वानकर, अक्षरा कांगरे, अयान शेख, सुमित जाधव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली.  तात्यासाहेब तांबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, धर्मदेव शिंदे, सचिन नाईकनवरे, अख्तर सय्यद, अशपाक आतार, सुप्रिया पवार, शशी गायकवाड, विकी माने यांच्यासह इयत्ता दहावी-बारावी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.