Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे : राजाभाऊ सोनकांबळे


महाराष्ट्र शासन जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे : राजाभाऊ सोनकांबळे 

सोलापूर : राज्यातील एकूण १७ लाख असलेल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप संपूर्ण राज्यभरात तीव्रतेने होत असून याचा शासकीय कामावर परिणाम झाला असल्याचे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी आजच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषद समोरील पुनम गेट समोर बेमुदत संपासाठी उपस्थित असलेल्या बहुसंख्य कर्मचाऱ्यासमोर बोलत होते. 



महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि राज्य शासकीय, निमशासकीय शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती, महाराष्ट्र यांच्या संयुक्तिक आदेशाने  एनपीएस धारक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकूण १७ प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्याची नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्येच जाहीर करून सरकारी कर्मचाऱ्यांना उचित न्याय देण्याऐवजी सरकारी कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्याचे काम करत असून या बेमुदत संपाबाबत योग्य तोडगा न काढता कर्मचाऱ्यांची दिशाभूल करीत आहे.


यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय भांगे, जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, कार्याध्यक्ष सीएस स्वामी, निमंत्रक बाळकृष्ण पुतळे, प्रमुख संघटक आशुतोष नाटकर, उपाध्यक्ष भीमराव लोखंडे, प्रभाकर माने, सुनील बोलाबत्तीन, प्रकाश चव्हाण, संतोष भंडारी, कार्यालयीन सचिव सटवाजी होटकर, शशिकांत भालेराव, रंगरेज, प्रवीण वाघमारे, समन्वय समितीचे अशोक इंदापुरे, आणि शंतनू गायकवाड  उपस्थित होते. यावेळी अनेक उपस्थित असलेल्या मान्यवर कर्मचारी नेत्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. आजच्या झालेल्या बेमुदत संपामध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्नित असलेल्या अनेक खात्यांनिहाय संघटनांचे प्रमुख पदाधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.