मराठा आंदोलनाला हिंसक वळण ? हे सारं षडयंत्र आहे, हे नक्की...!

shivrajya patra

                                     (प्रतिकात्मक छायाचित्र)

आज (सोमवारी) दुपारपासून मराठवाड्यात,बीड जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागले असल्याच्या बातम्या येत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आजमितीला आमरण उपोषण करून प्राणाची बाजी लावलेले मनोज जरांगे-पाटील हे आंदोलन शांततेत करा, असे तळमळीने सांगत असताना कोपर्डी प्रकरणात संपूर्ण राज्यात लाखोंचे मूक-मोर्चे काढणारा आणि १४ ऑक्टोबरची आंतरवली-सराटा येथील कोटींच्या गर्दीची सभा शांततेत पार पाडणारा सकल मराठा समाज,ज्या समाजाने जरांगे-पाटलांकडे एकहाती नेतृत्व सोपवणारा समंजस, शांतताप्रिय, महाराष्ट्राचा मूळ भूमिपुत्र असलेला, महाराष्ट्रातील इतर समाजाला थोरल्या भावाच्या भूमिकेतून वागवणारा मराठा आज अचानक हिंसक कसा होऊ शकतो ?

हे सारं षडयंत्र आहे, हे नक्की...आरक्षणाच्या मूळ मागणीला बगल देण्यासाठी, मराठा समाजाला बदनाम करून अन्य जाती-जमातींना चिथावण्यासाठी सुरू असलेले हे कृष्ण-कारस्थान आहे. तेव्हा मराठ्यांनी आता रात्र वैऱ्याची आहे, हे लक्षात घेऊन एकीकडे आंदोलनाची धार कायम ठेवून त्याची तीव्रता वाढवताना त्याच वेळी हिंसक कृत्य कोण करतंय आणि कुणाच्या चिथावणीमुळे ज्या-ज्या ठिकाणी घडतंय, त्या-त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून अहोरात्र सजग रहाणं गरजेचं आहे.

कारण आता मात्र खरंच रात्र वैऱ्याची आहे...
आता छुप्या दुष्मनांचा देखील बुरखा फाडणे गरजेचे आहे !
एक मराठा लाख मराठा... !
नव्हे 
तर आता
एक मराठा कोटी-कोटी मराठा ..!
                 
विवेक शं. येवले, करमाळा
३० ऑक्टोबर २३- ९४२३५२८८३४

(शिवभार : मराठा सेवा संघ, सोलापूर वॉटस् अॅप ग्रुप वर जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती नंदा शिंदे यांनी शेअर केलेला मजकूर)
To Top