प्रहार संघटनेत अहोरात्र जनतेसाठी काम करणाऱ्या, गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संताजी धनाजी पुरस्कार वितरण व विभागीय मेळावा होत आहे.
प्रहारचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून प्रहार जनशक्ती पक्षातील कार्यकर्त्यांसाठी व सामाजिक परिवर्तनासाठी अहोरात्र झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी "संताजी धनाजी कार्यकर्ता सन्मान अभियान २०२५" ही योजना १९ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत राबविण्यात आली. या योजनेस प्रहार जनशक्ती पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे.
या अभियानांतर्गत
१) नेताजी सुभाषचंद्र बोस सोशल मीडिया पुरस्कार,
२) संत गाडगेबाबा सामाजिक सेवा पुरस्कार,
३) बाळासाहेब ठाकरे ऑल राऊंडर पुरस्कार,
४) छत्रपती शिवाजी महाराज राजकीय धुरंधर पुरस्कार,
५) स्वामी विवेकानंद प्रभावी वक्ता पुरस्कार आणि
६) शहीद भगतसिंग बेस्ट आंदोलन पुरस्कार
असे सहा पुरस्कार प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या हस्ते विविध कार्यकर्त्यांना प्रदान करून सन्मानित येणार आहे.
तद्नंतर विभागीय मेळावा पार पडणार आहे. यावेळी बच्चु कडू हे उपस्थितांना संबोधितही करणार आहेत. या मेळाव्यास सोलापूर, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची जिल्हाप्रमुख मस्के-पाटील यांनी यावेळी दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असं आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता मस्के-पाटील आणि जमीर शेख यांनी केलं आहे.