Type Here to Get Search Results !

स्व. मनोज कुमार यांनी देशात क्रांती घडवली : मोहम्मद अयाज

मुंबई येथे श्रद्धांजली सभेत स्व. मनोज कुमार यांच्या आठवणींना उजाळा

मुंबई : महान अभिनेता मनोज कुमार यांचं नुकतेचं निधन झालं, ही संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला सुन्न करुन टाकणारी घटना आहे. ज्यांनी क्रांती चित्रपटातून देशभक्तीचा संदेश देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागविली. 'है प्रीत जहां की रीत सदा। भारत का रहेने वाला हूं, भारत की बात  सुनाता हूं ।' 'मेरे देश कि धरती सोना उगले ।' 'इक प्यार नग्मा है ‌।' या सारखे अनेक सुपर डुपर हिट चित्रपट आणि गाणी रसिकांना दिली.

रविवारी, ६ एप्रिल रोजी मुंबई येथील जूहू स्थित हॉटेल जे डब्ल्यू मेरिट इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सोलापुर चे गायक मोहम्मद अयाज यांनी मानाचा मुजरा म्हणून हजेरी लावली. स्व. मनोजकुमार यांनी आपल्या देशावरील प्रेम अख्खा जगाला दाखवून दिले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीला धक्का बसला, कधीच न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली, असल्याची भावना महागायक मोहम्मद अयाज यांनी श्रद्धांजली सभेत व्यक्त केली.

या कार्यक्रमात त्यांचे चिरंजीव अभीनेता कुणाल गोस्वामी, विशाल गोस्वामी यांच्यासह अभिनेता धीरज कुमार, आमीर खान, सुनिल गावस्कर, जया बच्चन, अरुणा ईरानी, उदीत नारायण, सोनू निगम, सुदेश भोसले, रामशंकर, प्रेम चोपड़ा, फरहान अख्तर, स्नेहा शंकर,  दिपक पराश, निल नीतीन मुकेश, आदित्य शंकर, रंजीत, अरुण बक्शी, जावेद जाफरी, सह सिने अभिनेता व अभिनेत्री मोठ्या संखेनी उपस्थित होते.

छायाचित्र : मनोज कुमार यांचे चिरंजीव कुणाल गोस्वामी व विशाल गोस्वामी यांच्यासमवेत मोहम्मद अयाज