सोलापूर : गया महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून काढून बौद्धांकडे सुपूर्द करण्याच्या समर्थनासह अन्य लक्षवेधी मागण्यांसाठी बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा ह्यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, 09 एप्रिल रोजी सायं 04 वा. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. जेलभरो आंदोलनाने या मोर्चाचा समारोप करण्यात येणार असल्याची माहिती भारत मुक्ति मोर्चाचे संयोजक ॲड. योगेश शिदगणे यांनी दिलीय.
बुधवारी, 09 एप्रिल रोजी सायंकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाचे समारोप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जेलभरो आंदोलनात करण्यात येईल.
निवडणुकीमध्ये EVM मशीन रद्द करून बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्यात याव्यात,OBC ची जाती आधारित जनगणना करण्याच्या समर्थनात आणि RSS आणि BJP च्या माध्यमातून मूलनिवासी बहुजन समाजातील महापुरुषांचा वारंवार अपमान करणाऱ्यांच्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या जेलभरो आंदोलनाला संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार असल्याचंही अॅड. शिदगणे यांनी म्हटलं आहे.