भंडारा : मानवाधिकारासाठी राष्ट्रीय पातळीवर देण्यात येणारा हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कलेच्या विविध क्षेत्रातील जनसेवेच्या दखलपात्र आणि अविस्मरणीय कार्य पाहून मानवाधिकार भूषण पुरस्कार जननायक अभय रंगारी यांना प्रदान करण्यात आला. मानवतावादी विचारांना आदर्श मानून मानवाधिकाराचे रक्षण, जतन, संवर्धनासाठी विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
अहिल्यानगर जिल्ह्यातील(अहमदनगर) संगमनेर पुणे-नाशिक हायवेवरील घुलेवाडी रोड, अमृता लॉन, येथे रविवारी, 06 एप्रिल रोजी दुपारी मानवाधिकार फाऊंडेशन च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून विधान परिषदेचे सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते अभय डी. रंगारी यांना मानवाधिकार भूषण 2025 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभय रंगारी यांच्याकडे विराट व्यक्तिमत्त्वाचे धनी, कवी, लेखक, मुक्त पत्रकार, प्रभावी वक्ता, समीक्षक, साहित्यिक, जननायक, लोकगौरव, शेतकरी कामगार नेते, राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते, कुशल संघटक तसेच मानवाधिकाराचे खंदे समर्थक, मानवाधिकाराचे रक्षण, जतन, आणि संवर्धनासाठी आपलं आयुष्य खर्ची टाकत आलेला समाजसेवक म्हणून पाहिले जाते.
देशाचे संविधान नागरिकांना मौलिक अधिकार देते, मानवाधिकार हे मनुष्य या नात्याने सर्व माणसांना जन्मताच प्राप्त होतात, मानव अधिकाराचा तात्पर्य मानवासाठी आवश्यक अधिकार असतो. मानव अधिकार हे वंश, लिंग, राष्ट्रीयत्व, वांशिक, भाषा, धर्म, किंवा इतर कोणत्याही स्थितीची पर्वा न करता सर्व मानवासाठी जन्मजात हक्क आहेत. त्यात जीवन आणि स्वातंत्र्याचा, गुलामगिरी आणि छळापासून स्वातंत्र्य, मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार आणि बरेच काही समाविष्ट आहेत.
यापैकी कोणत्याही अधिकारावर शासन-प्रशासन किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था ने या अधिकाराचे हनन केले, त्या-त्या वेळी अभय रंगारी यांनी याला पुरता विरोध करून मानवाधिकाराचे रक्षण, जतन, संवर्धन केलं आहे. त्यांच्या या अतुलनिय आणि अविस्मरणीय कार्याबद्दल मानवाधिकार भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभय हे जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज म्हणून परिसरात सर्वपरिचित आहेत. लोकांच्या कोणत्याही समस्या ते कायदेशीर मार्गाने त्वरित सोडवितात, त्यांना या अगोदर राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
त्या उल्लेखनीय पुरस्कारात लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे समाजसेवक पुरस्कार, संभाजी नगर (औरंगाबाद )निवड झाली, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई तर्फे कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार आणि मालवा ट्रस्ट, मुंबई तर्फे गोल्डन पिकाक अवार्ड ने गौरविण्यात आलं आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. येत्या 14 एप्रिल रोजी शाहू महाराजांच्या नगरीत (कोल्हापूर) येथे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.