Type Here to Get Search Results !

संभाजी ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन; अर्ज स्वीकारण्यासाठी उघडण्यात आली अधिक एक खिडकी

सोलापूर : येथील जात पडताळणी समिती कार्यालयाच्या गती 'शून्य' कारभाराच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कार्यालयाकडे एक-दोन वर्षांपासून जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याचा विद्यार्थ्यांना व नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आंदोलनाच्या वेळी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये कोणताच अधिकाऱ्याची उपस्थिती नव्हती, यावेळी जात पडताळणी समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कदम पाटील यांनी संभाजी ब्रिगेडशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून लवकरात लवकर युद्धपातळीवर जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामे करू, असं आश्वासन दिले. 

येथील जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या एक दोन वर्षापासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत, त्याचा फटका विद्यार्थ्यांना व नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करीत प्रशासनच्या गती शून्य कारभाराच्या विरोधात येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. 

सोलापूर समितीकडे शहर-जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारहुन अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. सध्यस्थितीला पूर्णवेळ अध्यक्ष असून देखील अनेक जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत. या जात पडताळणी प्रमाणपत्र साठी गरजू विद्यार्थी, नागरिक यांना करमाळा, माळशिरस, सांगोल्यासारख्या दूरवरच्या तालुक्यातून व काहीजण पर जिल्ह्यातून या कार्यालयात सारखे हेलपाटे मारत आहेत. त्यांचा आर्थिक व मानसिक त्रास टाळण्यासाठी प्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.